नाशिक

एचएएलला मिळालेल्या ऑर्डरमुळे नाशिकच्या उद्योजकांच्या आशा उंचावल्या

निमाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सीईओची भेट
नाशिक: प्रतिनिधी

नाशिकच्या एचएएल कारखान्यास लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्टच्या निर्मितीची मिळालेली ऑर्डर नाशिकची शान उंचविणारी आहे.नाशिकच्या उद्योजकांना त्याद्वारे सुटेभाग बनविण्याचे (इंडिनायझेशन)काम मिळाल्यास त्यामुळे या उद्योजकांचीही देश विकासाच्या कार्यात मोठा हातभार लागेल,असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.
एचएएल कारखान्यास गेल्या महिन्यात 8800 कोटी रुपयांच्या ट्रेनर विमानांच्या निर्मितीची ऑर्डर मिळाली आणि आता लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट निर्मितीची ऑर्डर म्हणजे सोने पे सुहागा असेच त्याचे वर्णन करता येईल असे सांगून बेळे यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांसह एचएएलचे नूतन सीईओ साकेत चतुर्वेदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आणि त्यानंतर चर्चेच्यावेळी वरीलप्रमाणे प्रत्यक्ष मागणी केली.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना चतुर्वेदी यांनी निमाच्या कार्याचे कौतुक केले.एचएएलला जी ऑर्डर मिळाली त्याच्या सुट्या भागांचे निमाच्या सहकार्याने लवकरच खास प्रदर्शन भरविण्यात येईल,असे चतुर्वेदी म्हणाले.तसेच सुट्या भागांच्या निर्मितीचे काम नाशिकच्या उद्योजकांना देण्याबाबतच्या निमाच्या विनंतीचा विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याने नाशिकच्या उद्योजकांच्या आशाआकांक्षा उंचावल्या असल्याचे बेळे यांनी नमूद केले.
एचएएल आणि निमाचे खूप जुने संबंध आहेत.नाशिकला एचएएलचा फार मोठा व्हेंडरबेस आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न बघितले आहे.पोषक वातावरण आणि मुबलक अडलेल्या जागेचा विचार करून नाशिकला डिफेन्स हब बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने इंडिनायझेशनमध्ये सहभागी होण्याचे भाग्य नाशिकच्या उद्योजकांना लाभावे आणि येथील उद्योगव्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यास चालना मिळावी असे निमाला वाटते असेही बेळे म्हणाले. नाशिक हे एअरकनेक्टिव्हिटीने मोठयाप्रमाणात जोडले जावे यासाठी एचएएलने दिलेले योगदान मोलाचे असल्याचेही बेळे यांनी गौरवाने नमूद केले.यावेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार,कोषाध्यक्ष विरल ठक्कर,पॉवर एक्झिबिशनचे चेअरमन मिलिंद राजपूत,राजू वडनेरे आदी उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago