नाशिक

बांगलादेश बॉर्डर बंदचा कांदा निर्यातीला मोठा फटका

शेतकरी अडचणीत; केंद्राने निर्यात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न गरजेचे

लासलगाव : वार्ताहर
गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातलेल्या बंदीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका देशातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांना बसत असून, निर्यातीवरील अवलंबित्वामुळे कांद्याचे बाजारभावही कोसळत आहेत.
भारतातून होणार्‍या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. 2024-25 या आर्थिक वर्षात 4.80 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती, ज्यातून देशाला 1724 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.
भारतातून बांगलादेशमध्ये दोन नंबर गुणवत्ता असलेला कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो. त्यामुळे देशातून 40 टक्के एवढा मोठ्या प्रमाणात कांदा एकट्या बांगलादेशमध्ये विकला जातो. मात्र, बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याची कोंडी केल्याने देशामध्ये मुबलक कांदा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड झाल्याने कांद्याचे दरही 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटलच्या घरामध्ये अडकलेले आहे.
बांगलादेशकडून अघोषितपणे आयात थांबवण्यात आल्याने महाराष्ट्रातील विशेषतः लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून, भावही परवडण्यासारखे नसल्याचे शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago