उत्तर महाराष्ट्र

लाभार्थी कर्ज बुडवतो, हीच राष्ट्रीयीकृत बॅकांची मानसिकता

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची टीका

नाशिक ः प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकाच्या आडमुठे धोरणामुळे लाभार्थींना वेळेत कर्ज मिळत नाही. महामंडळाच्या योजनांना त्यामुळे आडकाठी निर्माण होते. आपल्याकडे कर्ज मागायला येणारा हा कर्ज बुडवाच आहे, अशी मानसिकता राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकार्‍यांची झाली आहे.

पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची ‘एसीबी’ चौकशी करा ! – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी

त्यामुळे कर्ज देण्याऐवजी कर्जप्रकरणे न करण्यावर या अधिकार्‍यांचा भर असतो, अशा बँकांबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोहदरी घाटात बर्निंग कारचा थरार

केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना राष्ट्रियकृत बँकांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत पोहचायला हव्यात. मात्र, हे होत नाही,याकडे राष्ट्रीयकृत बॅकांनी गांर्भीयाने पाहिले पाहिजे.असे खडेबोल राष्ट्रीयकृत बॅकांना सुनावले.केंद्र आणि राज्य सरकारच्या मतानुसार छोटे व्यवसाय करणार्‍या लोकंाना मदत करू शकलो तर नक्कीच आत्मनिर्भर भारत होण्यास वेळ लागणार नाही.

अधिकमासामुळे यंदा आठ श्रावणी सोमवार

 

आयातीवर अवलंबून रहावे लागणार नाही.बॅकाची कर्जे देण्याची जबाबदारी आहे.  राष्टियीकृत बँकांनी मोठे कर्जे देऊन डुवविणार्‍याचंी संख्या वाढविण्यापेक्षा छोट्या उद्योगांना कर्जे दिले तर देश आणि राज्य प्रगती करू शकतो. बॅक ऑङ्ग महाराष्ट्रच्या जिल्ह्यात 85 शाखा आहेत.गेल्या 3 ते चार वर्षात 2 हजार 403 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात तेथे 82 प्रकरणे झालेले आढळून आले.

समृद्धी महामार्गावर  अपघात; चार ठार

मराठा उद्योजक झाला पाहिजे ही संकल्पना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मनावर घेतली होती.त्यानंतर विविध महामंडळातून विविध कर्जे देण्याची योजना होती.त्या योजनेचा योग्य वापर प्रतिसाद होत नव्हता.त्यामुळे अण्णासाहेब पाटील  आर्थीक मागास विकास महामंडळाची योजना बदलली\

शेतात कामाला जाण्यास सांगितल्याने मुलाने केला जन्मदात्या पित्याचा खून

 

त्यामुळे व्यवसाय करण्याकरीता सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँक,किंवा खासगी बँकांकडून कर्ज घेवू शकतात.घेतलेल्या कर्जाचे 12 टक्याप्रमाणे व्याज हे सबसीडी म्हणून व्याज परतावा शासन देते. राज्यामध्ये 61हजार 650 प्रकरणे झाले आहेत.यामध्ये 4 हजार 372 कोटी कर्ज वाटप बॅकेच्या माध्यमातून झाले आहे.56 हजार 121 एवढे लाभार्थी व्याज परताव्याच्या माध्यमातून लाभ घेत आहेत.त्याचबरोबर 4हजार 466 एवढे व्याज परतावा झालेला आहे.
युनियन इंडस ,बॅकेने 907 प्रकरणे केली आहेत. कोटक बॅकेने 887 , एयू बँक 557 प्रकरणे केली आहे. याशिवाय डॉ.भूषण गायकवाड तसेच महिला तेजस्विनी साळुंके,सारीका ङ्गुले अशा काही लाभार्थ्यांनी वेगळा व्यवसाय केला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झोनल बैठका घेत आहे.केंद्राची राष्ट्रीयकृत बॅकंावर कंट्रोल असला पहिजे.यासाठी प्रयत्न सुरू आहे.

मुदत संपूनही 333 कोटीचे दायित्व कसे?

बैठकीत हिंदी भाषीक मॅनेजर असल्यास त्यांच्यासाठी योजना भाषांतरीत करून देण्यात येणार आहे. योजना समजली तर न्याय देवू शकतील. लाभार्थ्यांनी कोणत्या योजनेसाठी अर्ज केला याचे रजिस्टीर नोंद केली जात नाही त्यामुळे त्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणे किती आहे हे कळत नाही.असेही पाटील म्हणाले.

लासलगाव येथे जोरदार वादळी पावसामुळे कांदा शेड भुईसपाट

ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू होणार
राज्यात शेतकर्‍यांसाठी टॅक्टर योजना चांगली होती.मध्यंतरी सरकार बदलल्याने योजना बारगळली योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे.तज्ज्ञांनी इंन्टीट्यूशनल सेल्स्च्या माध्यमातून मॅनिङ्गॅक्चरींग कंपन्या थेट सवलती शेतकर्‍यांना देऊ शकतात असे सुचविल्यामुळे पुन्हा एकदा योजनेसाठी आता परिपत्रक काढले परंतु अनेक डिलर आणि मॅनिङ्गॅक्चरींग कंपन्यांनी नकार दिला.केवळ एका कंपनीने होकार  दिल्याने त्याकंपनीशी अधिकृत करार करणार आहे.या योजनेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत टॅक्टर घेता येणार आहे. जुलैपासून ही योजना सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

खरंच फिट आहात का…?

कारणे दाखवा नोटिसा देणार
कॅनरा बँक ,बॅक ऑङ्ग इंडिया,एचडीएङ्गसी,एक्सीस बॅक,पंजाब सिंध बॅक या बॅकंाची अनुपस्थिती होती. बैठकीला अनेक बॅका गैरहजर राहिल्याने नरेंद्र पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणे पडले महागात

जिल्ह्यात चांगला प्रतिसाद
नाशिक जिल्ह्यात 6 हजार 185 लाभार्थी आहेत.त्यामध्ये 41 कोटींचे कर्जवाटप राष्ट्रीयकृत,सहकारी आणि एचडीएङ्गसी बॅके,खासगी बॅकेने केले आहे.एकूण लाभार्थी 5 हजार 797 आहेत.त्याशिवाय 47 करोड 65 लाख व्याज परतावा नाशिक जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना दिला आहे.

गुटखा विरोधी अभियानाला यश; दोन दिवसात १० गुन्ह्यांची नोंद

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

7 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

7 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

7 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago