विरगांव येथे बिबट्याचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला

सटाणा प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील विरगाव येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळींच्या कळपावर हल्ला करुन ८ शेळ्या फस्त केल्यात गावात बिबट्या शिरल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरगांव येथील धोंडू शंकर सोनवणे यांच्या शेळींच्या वाड्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून ८ शेळ्यांना ठार केले. तर एका शेळीला गंभीर जखमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. यामुळे सोनवणे यांना आर्थिक नुकसान झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. करंजाडी खोऱ्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. बिबट्यांचे वास्तव्य उसाच्या शेतीमध्येच राहात होते. उस तोडणी सुरू झाल्यामुळे त्याचे वास्तव्य धोक्यात आल्याने ते मानवी वस्तींकडे चाल करू लागले आहेत. गावात बिबट्या शिरल्यामुळे विरगांव व परिसरातील गावे दडपणाखाली आली आहेत.
Bhagwat Udavant

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

5 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

5 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

6 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

6 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

6 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

6 hours ago