संतापजनक ! बसमध्ये कोंबले 150 विद्यार्थी

नाशिक वाडीवऱ्हे बसमधुन विद्यार्थी करताय जीवघेणा प्रवास

नाशिक : वार्ताहर
चार दिवसांपुर्वीच औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ घडलेली बस दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच जुन्या सीबीएस मधुन वाडीवऱ्हेकडे जाणाऱ्या बससंबंधी एक भयावह असा चीड आणणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
जुन्या सीबीएस येथुन दररोज दुपारी 3 च्या सुमारास नाशिककडून वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी बस सुटते. काल दुपारी या पंचवटी डेपोच्या बस (क्रमांक एमएच 14 बीटी 4509) मध्ये  सुमारे दीडशे शालेय विद्यार्थी कोंबुन भरलेले दिसुन आले.  शाळा, कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाण्यासाठी सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमध्ये मुठीत जीव घेऊन जीवघेणा प्रवास दररोज करतात. या विद्यार्थ्यांच्या जीवाला हानी पोहोचल्यास अथवा बससोबत काही अघटीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या 8 दिवसांत जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी बसेसला आगी लागल्याच्या घटना घडल्या. औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ बसचा अपघात ताजा असतांनाच काल पुण्याजवळ बसला आग लागली यात सुमारे 27 प्रवाशी बालंबाल बचावले. या घटना ताज्या असतांनाच, बसमध्ये सीटची संख्या 55 असतांनाच अशाप्रकारे सुमारे 150 विद्यार्थ्यांना कोंबणे कितपत व्यवहार्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.
यासंबंधी आमच्या वार्ताहरांनी अधिक तपास केला असता समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नाशिक वाडीवऱ्हेसाठी वाडीवऱ्हे डेपोतुन दर तासाला नाशिककडे बस सुटते.  दिवसभरात अशा सुमारे 12 तासात 12 बसेस सुटतात. मात्र त्या केवळ कागदोपत्रीच. यासंबंधी तथ्ये तपासली असता साधारण: अडीच ते तीन तासांनी वाडीवऱ्हे येथुन नाशिकला 1 बस येते अशी माहिती समोर आली.
वाडीवऱ्हे येथुन सकाळी सुटलेली बस बारा ते साडेबारा दरम्यान नाशिकला पोहोचते त्यानंतर अडीच ते तीनच्या सुमारास दुसरी बस नाशिकला पोहोचते. सकाळच्या सत्रातील शाळा, कॉलेज करुन घरी जाण्यासाठी सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सीबीएस बस स्टॅण्डवर ताटकळत उभे असतात. अडीच ते तीनच्य सुमारास वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी केवळ एकच बस सुटत असल्याने याच बसमध्ये सुमारे 150 विद्यार्थी अतिशय दाटीवाटीने शेळ्यामेंढऱ्यांप्रमाणे कोंबुन या बसमधुन प्रवास करतात.
यासंबंधी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे अतिशय धोकादायक आहे. एखादा अपघात घडून कुणाचा जीव गेल्यावरच महामंडळाला जाग येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांसह प्रवाशी विचारत आहे.

वाडीवऱ्हे आगारातून नाशिकसाठी दर तासाला एक बस सुटते मात्र ती कागदोपत्रीच. प्रत्यक्षात दर तीन तासाला एक बस नाशिकला पोहोचते. या समस्येचे मुळ कारण बसच्या संख्येत आहे. वाडीवऱ्हे आगाराकडे असलेल्या बसची संख्या प्रत्यक्षात कमी आहे. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी वेळप्रसंगी नाशिक आगारवाले पंचवटी डेपोच्या बसेस वाडीवऱ्हेला जाण्यासाठी उपलब्ध करुन देतात. केवळ एक बस असल्याने विद्यार्थी घरी जाण्यासाठी याच बसमध्ये गर्दी करतात. त्यामुळे सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमधुन प्रवास करतात. दुर्देवाने काही अघटीत घडल्यास कुणाला दोष देणार असा संतापजनक सवाल प्रवाशी विचारत आहेत.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago