शहर विकास हा पक्ष राजकारणा पलिकडे हवा

 

सत्यजित तांबे : राजकीय साक्षरतेचा अभाव

नाशिक : प्रतिनिधी
शहर विकास हा पक्षीय राजकारणा पलिकडे जाऊन पाहायला हवा, दुर्दैवाने तसे होत नाही. पुणे,ठाणे,नाशिक आणि नागपूर चार शहरे सोडल्यास बाकीच्या 27 महापालिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुर्दैवाने मागच्या दहा पंधरा वर्षात लोकांच्या अपेक्षा संपत चालल्या आहे. नागरिकांचे दबावगट पूर्वी असायचे ते आता राहिले नाही.नवी मुंबईत नागरिकांचे दबावगट दिसून येत नाही. औरंगाबाद, नगर, अकोला, धुळे या महापालिकांची अवस्था अतिशय वाईट आहे. असे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
सिटीझनविल या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी झाले. शासन,लोकसहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञान यांंचा समन्वय साधून काही प्रश्‍नांची उत्तरे कसे सापडतील यावर आधारित सिटीझनविल पुस्तक आहे. या पुस्तकाशी संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींशी काल सत्यजित तांबे यांनी संवाद साधला. हे पुस्तक आणि त्यातील संकल्पना सामान्यांपर्यत पोहोचले पाहिजे यासाठी माध्यमांचा पर्याय निवडून जनतेपर्यंत पोहण्याचे प्रयत्न सुरू आहे.असेही यावेळी सत्यजीत तांबे यांनी विचार मांडले.
शहर विकास मुळता पक्षीय राजकारणाच्या वर जाणे हा गरजेचा विषय झाला आहे. शहराचा विकास होत आहे. 2013 /14 हार्वड युनिव्हर्ससिटीत गेलो असता प्राध्यापकंानी हे पुस्तक वाचायला दिले होते.या पुस्तकात 13 ते 15 भारतीयांचा उल्लेख केलेला आहे.ज्या भारतीयांनी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये बदल घडून आणण्यास मदत केली आहे.सिलिकॉन व्हॉलीतील हे शहर असल्याने अनेक भारतीय आयटी कंपन्या प्रमुख पदावर काम करीत आहे. भारतीयांनी तिथे जाऊन मदत केली तर इथे भारतात राहून भरपूर मदत करू शकतात.प्रश्‍न आहे मानसिकता बदण्याची गरज आहे.लोकसहभाग कसा वाढवायचा याचा महत्वाचा भाग म्हणजे राजकिय साक्षरता आहे.जोपर्यत राजकीय साक्षरता होत नाही.आज ऐंशी टक्क्े साक्षरता असूूनही विचार करता येत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी खंतही तांबे यांनी यावेळी व्यक्त केली. डिजिटल साक्षर होणे नागरिकांची गरज आहे. तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.यासाठी शाळांपासून सुरूवात करावी लागणार आहे.त्याचप्रमाणे मतदार,पालिकाव्यवस्था,शासन,लोकसहभाग गरजेचा आहे.
पुस्तक डिजिटल तंत्रज्ञाचा वापर करून शहरांचा विकास कसा करायचा.लोकसहभाग किती महत्वाचा आहे.शासन,लोकसहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञान यांंचा समन्वय साधून काही प्रश्‍नांची उत्तरे कसे सापडतील यावर आधारित सिटीझनविल पुस्तक आहे.हे पुस्तक अमेरिकेतील असल्याने तंतोतंत सुचनांचे पालन करु शकत नाही याची कल्पना आहे. प्रश्‍नाचा दृष्टीकोनाला कल्पना,विचार प्रक्रियेंचे काम पुस्ताच्या माध्यमातून व्हावे ही अपेक्षा आहे

Devyani Sonar

Recent Posts

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…

5 hours ago

गौतमी पाटील आता गाजवणार छोटा पडदा

गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…

5 hours ago

राज्यपालांची जागा राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. देशात राष्ट्रपती घटनाप्रमुख असतात, तर राज्यांत तेच काम राज्यपाल…

5 hours ago

अभिनेत्री डॉ.जुई जवादे यांचे ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपटातून पदार्पण

 भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि  ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…

5 hours ago

गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

दिंडोरी  : प्रतिनिधी  दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…

6 hours ago

चुंचाळ्याला भरदिवसा घरफोडी, 1 लाखाचे दागिने लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी सविता सागर…

6 hours ago