नाशिक

सिटीलिंक बसला तोट्यात नेणारे ‘ ते ‘ मार्ग होणार बंद

 

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना काळात सुरू केलेली सिटीलिक (citylink) बस सध्या तोट्यात सुरू आहे. काही मार्गांवर या बसला तुफान प्रतिसाद मिळतोय . तर काही मार्गावर प्रवासीच नसल्याने त्या ठिकाणी मोठा तोटा सहन करावा लागतोय . दरम्यान , शहरातील किती मागांवर सिटीलिंक शहर बसला तोटा होतो आहे हे शोधण्याचे काम सुरू असून , अशा मार्गावरील शहर बस लवकरच कायमची बंद करण्यात येणार असल्याची शक्यता आहे . नाशिक शहरात २०० च्या जवळपास महापालिकेच्या बसेस रस्त्यांवर धावत आहेत. मात्र , ज्या प्रमाणात नफा होणे अपेक्षित आहे , तो होत नसल्याने सध्या बससेवा तोट्यात सापडली आहे . नाशिक महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असताना बससेवा देखील तोट्यात सापडत आहे .  ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी याबाबत आढावा बैठक घेऊन चर्चा केली. ज्या मार्गावर अत्यंत कमी उत्पन्न मिळत आहे, अशा मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली . ८ जुलै २०२१ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरातील रस्त्यावर धावत होत्या. दरम्यान, हळूहळू लॉकडाऊनची परिस्थिती दूर झाल्याने बसच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आली . उत्पन्नवाढीसाठी शासनाने दिलेल्या जाहिरात धोरणाचा देखील वापर करण्यात येणार असून, महापालिकेच्या बसेसवर येत्या काळामध्ये जाहिरात दिसून येणार आहे . पहिल्या सात महिन्यांत सुमारे पाच कोटी रुपयांच्या तोट्यात महापालिकेची बससेवा सुरू होती. मात्र, महापालिका ज्याप्रमाणे इतर सुविधा नाशिककरांना देते त्याच पद्धतीने बससेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ती तोट्यात गेली तरी सेवा सुरूच राहील . केवळ तोटा कमी कसा राहील , यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे . नाशिक शहरात महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाने शहर बस चालवण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर पालिकेने धुमधडाक्यात बससेवा सुरू केली होती . मात्र , आता सिटीलिक बसला देखील तोट्याचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे . यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासन आता कमी उत्पन्नाच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद करण्याची शक्यता आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago