सृष्टीवर ज्ञान, विद्या आणि चरित्र हे नकल करून मिळत नाही, ते अर्जित करावं लागतं. साम्राज्य निर्माण होतात, नष्ट होतात. निर्माण होणं, नष्ट होणं हा सृष्टीचा नियम आहे. मात्र, साधना करून अर्जित केलेले तत्त्वज्ञान हे अमर असतं. साधना केल्याशिवाय जीवनात कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही.

कठोर साधना हीच कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली असते. ज्या पद्धतीची साधना आपण करू त्या क्षेत्रातील उंची आपण नक्कीच गाठू शकतो. पण ही उंची आपल्याला नकल करून गठन शक्य होणार नाही. वरकरणी जरी आपण उंची गाठल्याचा भास आपल्याला होत असला, तरी तो वास्तविक भ्रम असतो. असत्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने प्रवास करता येईलही, पण तो मर्यादित अंतरावरचा असत्याचा रथ फार काळ मैदानावर टिकत नाही. दीर्घकालीन प्रवासासाठी मात्र मती आणि गती ही सत्याची अभिव्यक्ती असणं गरजेचं आहे. तेव्हाच अनियंत्रित प्रवास यशस्वी होतो. सत्य समजणं एवढं सहज सोपं नसतं आणि त्यापेक्षाही सत्य समजून आचरण करणं हे त्यापेक्षाही कठीण असतं. मुळात सत्य ही तपस्या कठीण आहे, पण अवघड नाही. विद्यमान युगात सत्याची अभिव्यक्ती होण्याची मानसिकता फार कमी लोकांची आहे आणि म्हणून अर्जित करण्याऐवजी नकल करण्यावर सध्या जास्त लोकांचा भर आहे. क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात आपण आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व हे अर्जित करणं कधीही उत्तम ठरतं. निसर्गाने प्रत्येकाला समान दिलेलं आहे. पण कोणाची प्रतिभा कधी प्रकट होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. प्रतिभा ही शिक्षण, उच्च शिक्षण, पदवी यामधून निर्माण होत नाही. आपला अनुभव, आपला संयम, प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा भाव, दृष्टिकोन, परिपक्वता, वैचारिक प्रगल्भता, वेळेचं भान आणि मीपणाचा लवलेश नष्ट होणं. मी कोणीही नाही. शून्य आहे हा भाव जागृत झाल्याशिवाय प्रतिभा निर्माण होत नाही आणि नवीन ज्ञानाचा किरण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ज्ञान हे अमर्याद आहे आणि भविष्यातील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, दिनदर्शिका ठरेल असं प्रभावी ज्ञान हे नकल करून नाही तर साधना करून अर्जित करून निर्माण होतं. आणि ते आपोआप सुसाट वेगाने लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून चरित्र, ज्ञान, विद्या ही साधना करून अर्जित केली तर अमर होते. अन्यथा प्रचार आणि प्रसिद्धीचा जेवढा काळ आहे, त्या काळापुरती मर्यादित राहते. म्हणून जे अमर्याद काळासाठी आहे ते साधनेतून निर्माण होतं. आपला विश्वास आपल्या साधनेवर असला पाहिजे आणि आपली साधना योग्य दिशेने असली की,त्यामधून निर्माण होणारं तत्त्वज्ञान हे आपोआप लोककल्याणकारी ठरतं.

        –    गणेश खाडेे

Gavkari Admin

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

6 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

6 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

9 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

9 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

10 hours ago