नाशिक

घोटी स्टेट बँकेच्या समोर ग्राहकांची तोबा गर्दी

 

धामनगाव :सुनील गाढवे
इगतपुरी तालुक्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी स्टेट बँकेत तालुक्यातील हजारो ग्राहकांचे खाते असून व्यापारी,पेन्शनर्स,नोरदार शेतकरी,सेविंग खाते बचत खाते व चालू खाते ,शैक्षणिक कर्ज ,पिक कर्ज, वाहन कर्ज रक्कम काढणे, टाकणे ह्या विविध कामानिमित्त बँकेत वयोवृद्ध ग्राहकांना दूरधरून पंचवीस तीस किलोमीटर वरून यावे लागते परंतु या स्टेट बँकेला आजपर्यंत ग्राहकांच्या बाबतीत कधीही कळवळा निर्माण झालेला नाही, त्यात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे स्थलांतर मोकळ्या जागेत होणे गरजेचे आहे बँकेचा कारभार बघता त्यात आत मध्ये ग्राहकांची गर्दी, बैंकेत ग्राहकांना जागा देखील होत नसल्यामुळे बाहेर सिक्युरिटी गार्ड तासंतास प्रतीक्षा केल्यानंतर ग्राहकाला सोडले जाते त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत असते बाहेरच पासबुक प्रिंट करणे,तेथेच एटीएम त्यामुळेच गर्दीच गर्दी होत असते. एटीम बंद असेल तर आत मध्ये स्वॅप मशीन ठेवून त्यावर कार्ड स्वॅप करणे मग एटीएम सुविधा असली काय आणि नसली काय? त्याचा काय उपयोग तरी काय ?
स्टेट बँकेने वरिष्ठ स्तरावर या बँकेच्या अडीअडचणींची सखोल चौकशी करून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा असा सर्वसामान्यांचा प्रश्न असून केवायसी साठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे बँकेत येतांना ग्राहकांना घरूनच जेवणाचा डबा म्हणजेच शेतकऱ्याच्या भाषेत भाकर बांधून आणावी लागते कारण नंबर कधी लागेल सांगता येत नसल्याने ग्राहा कांच्या मनात बैंकेविषयी निराशा आहे विशेष म्हणजे या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर बँकेने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे तरच पंचवीस तीस किलोमीटर वरतून येणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळेल.

Ashvini Pande

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

9 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

9 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

9 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

9 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

10 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

10 hours ago