नाशिक

अवकाळीमुळे बेदाणा उत्पादक संकटात

उघड्यावर ठेवलेले द्राक्ष, बेदाणा भिजल्याने नुकसान

दिक्षी : वार्ताहर
यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादकांना प्रतिकिलो 50 ते 80 रुपये दर मिळाल्याने बेदाणा उत्पादकांसाठी द्राक्षांना 25 ते 30 रुपयांचा भाव देऊनही कच्चा माल मिळत नसल्याने बेदाणा उत्पादक हवालदिल झाला होता. या परिस्थितीत बेदाणा उत्पादकांनी द्राक्षमणी खरेदी केली. मात्र, मालाला सुकवण्यासाठी बनवण्यात आलेल्या शेडला व वाळण्यासाठी उघड्यावर टाकलेल्या बेदाण्याला गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. बेदाण्याचे मोठे नुकसान झाल्याने बेदाणा उत्पादक अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष बेदाण्यांचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केवळ बेदाण्याचेच नाही, तर इतर पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले.

अवकाळी पावसाने बेदाणा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. उघड्यावर ठेवलेले द्राक्षे आणि बेदाणा भिजल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तरी शासनाने त्वरित पंचनामे करून बेदाणा उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी.
-राजू पठाण, बेदाणा उत्पादक, दिक्षी

Gavkari Admin

Recent Posts

पोलीस अधीक्षक देशमाने यांची बदली

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने…

8 hours ago

सिन्नर तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली. मौजे नळवाडी, ता.…

10 hours ago

मॉन्सून अरबी समुद्रात दाखल

अंदमानही व्यापला; 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे : यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात…

13 hours ago

मोटारसायकल अपघातात मनमाडला पिता-पुत्राचा मृत्यू

चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले मनमाड : प्रतिनिधी अंतापूर-ताहाराबादवरून देवदर्शन करून परतणार्‍या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला.…

13 hours ago

अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी इयत्ता 11 वी प्रवेशाच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, नाशिकमधून तब्बल 371 शाळा…

13 hours ago

कसारा विभागातील फुगाळा येथे ड्रोनची माहिती मिळताच पोलिस धावले

शहापूर ः प्रतिनिधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राइक केला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर…

14 hours ago