मनपा देणार बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा
नाशिक : प्रतिनिधी
दोन आठवड्यांत एकही डेंग्यू रुग्ण आढळून न आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, तिसर्या आठवड्यांत डेंग्यूचा शिरकाव झाला असून, सात दिवसांत आठ रुग्ण बाधित झाल्याने मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. याप्रकरणी मलेरिया विभागाने खबरदारी घेत बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही, याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष केल्यास व्यावसायिकांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत.
जानेवारी ते मेपर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या 113 वर आहे. परंतु यंदा गेल्या वर्षीपेक्षा रुग्णवाढीचा वेग कमी असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. गतवर्षी तब्बल बाराशेहून डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली होती. नागरिकांकडून याविरोधात आंदोलने केली गेली होती. मात्र, यंदा डेंग्यू नियंत्रणाबाबत वेळीच उपयोजना केल्याचा फायदा आरोग्य विभागाला होताना दिसतो. म्हणूनच यंदा सव्वाशेपर्यर्ंत रुग्णसंख्या अडकली आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. डेंग्यू डासाची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी फ्रिज, कूलरमध्ये पाणी साचवू देऊ नये. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही त्याची काळजी घ्यावी. याविषयी नागरिकांना माहिती दिली जात आहे. रहिवासी परिसर, अपार्टमेंट, घरातील गच्चीवर अडगळीला पडलेल्या वस्तूंंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने याची पथक पाहणी करत नोटिसाही दिल्या जात आहेत.
अवकाळी पावसामुळे डासांची संख्या कमी
मे महिन्यात पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावली.
त्यानंतर पावसाने वेळोवेळी शहराला झोडपून काढले.
यामुळे गेल्या काही दिवसांत वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव झपाट्यात कमी झाल्याचे चित्र आहे.
बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा धाडणार
नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचणार नाही
याची काळजी घ्यावयाची आहे. याकडे संबंधितांनी
जर लक्ष दिले नाही तर नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…