नाशिक

टंचाई घोषित होऊनही पोहोचेना टँकर

देवगाव, सामुंडी परिसरातील वाडी-वस्त्या तहानेने व्याकूळ

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींतर्गत वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या उद्भवांचा साठा अल्प प्रमाणात राहिल्याने त्र्यंबक-इगतपुरीचे उपविभागीय अधिकार्‍यांनी टंचाईग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे, तरीही टँकर पोहोचले नसल्याने या वाड्यावस्त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत.

सामुंडी ग्रामपंचायतींंतर्गत सामुंडी, कातकरी वस्ती, खाडे वस्ती, भागओहळ ग्रामपंचायतींतर्गत भागओहळ, फणसपाडा, बाभूळपाडा आणि देवगाव ग्रामपंचायतींंतर्गत श्रीघाट, रायपाडा, मेट येल्याची, पाराचा आंबा, ढोलेवाडी, निमोणवाडी यांचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांनी 6 मे रोजी त्र्यंबक तहसीलदार, पंचायत समिती गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांच्या सादर अहवालाच्या आधारे टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ग्रामपंचायतींनी तसेच पंचायत समितीने महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 चे कलम 21 ते 26 ची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी. गावातील प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोतापासून 1000 मीटरपर्यंत यापैकी जे अधिक असेल, अशा क्षेत्रातील विहिरी तात्पुरत्या बंद करून पाणी उपश्यावर निर्बंधाचे आदेश पारित केले. त्याची कितपत अंमलबजावणी झाली हे समजू शकले नाही. मात्र या गाव वस्त्यांना संबंधित शासन यंत्रणेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत शिफारस केलेली असताना दोन आठवडे झाले तरीदेखील देवगाव, सामुंडी येथील वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पोहचलेले नाही. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी भरतात. त्यात अवकाळी पाऊस येत असल्याने पाणवठ्यावर सर्वत्र गाळ साचलेला आहे. पाणी गढूळ झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र, शासन यंत्रणा लक्ष देत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीपैकी ढोलेवाडी, पाराचा आंबा येथे पाणीटंचाई निर्माण असून, तत्काळ टँकर मंजूर करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली होती. त्यानंतर सात मे रोजी टँकर मंजूर करण्यात आला. मात्र एक आठवडा होऊही अद्याप टँकर पोहोचला नाही. महिलांना वैतरणा धरणाच्या कडेला जाऊन जमिनीत खड्डे खोदून पाणी आणावे लागते. परिसरात एक कोटी 93 लाखांची जलजीवन योजना राबविले आहे.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील ग्रामीण जनतेला पाणी मिळत नाही.

अवकाळी पावसाने तर अधिकच दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

– भगवान मधे, एल्गार कष्टकरी संघटना

Gavkari Admin

Recent Posts

इंस्टाग्रामची मैत्री पडली महागात, वर्ग मित्राने मैत्रिणी सोबत केले असे काही….

इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली - नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सिडको विशेष…

16 hours ago

मल्ल विजय चौधरीने पटकावली चांदीची गदा

सटाण्यात रंगल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या सटाणा ः प्रतिनिधी स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या…

1 day ago

नाशिक रोड रेल्वे स्थानकात मॉकड्रिल

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला…

1 day ago

भाजपाच्या तिरंगा रॅलीत देशभक्तीचा महापूर

पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक ः प्रतिनिधी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात…

1 day ago

नांदगावजवळ भीषण अपघातात तीन ठार

नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार सहा गंभीर जखमी मनमाड : आमिन शेख :…

1 day ago

सिन्नरला अवकाळीचे दोन बळी

सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट,…

1 day ago