नाशिक

बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच

घन कचरा विभागाची कारवाई: साडेनऊ लाखांचा दंड वसूल

नाशिक : गोरख काळे
राज्यात प्लास्टिक बंदी कायदा असून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक वापरावर बंदी आहे. या प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. महापालिका देखील शहर परिसरात प्लास्टिक वापरणार्यावर कडक कारवाई करत आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षात महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने सहाही विभागात 72 ठिकाणी कारवाई करत नऊ लाख दहा हजार दंड वसूल केला.
शहरभरात सुरू असलेल्या प्लास्टिक दंडात्मक  कारवाईमुळे प्लास्टिक चा वापर कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र चालू वर्षात घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या कारवाईचा आकडा व दंडाची रक्कम पाहता शहरात प्लास्टिकचा वापर वाढल्याची चिंताजनक परिस्थिती पहायला मिळत आहे.
नाशिक शहरात राज्यासह पर राज्यातून प्लास्टिक येत असल्याने यावर जर प्रतिबंध लावल्यास प्लास्टिक बंदी मोहिमेस गती येऊ शकेल. एप्रिल 2022 पासून ते चालू सप्टेंबर महिन्यात प्लास्टिक वापर प्रकरणी 75 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून नऊ लाख 45 हजार दंड आकारण्यात आला आहे. अवघ्या सहा महिन्यात कारवाई गतवर्षीपेक्षा जादा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरप्रकरणी आणखी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेने मागील सहा महिन्यात शहर परिसरात प्लास्टिक पिशवी वापर प्रकरणी दंडात्मक कारवाई करत तब्बल नऊ लाखाचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात दंडाची रक्कम ही नऊ लाख दहा हजार इतकी होती. ते पाहता शहरात प्लास्टिक पिशवी वापर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

प्लास्टिक बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापराव्या. व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानामध्ये प्रतिबंध घातलेल्या प्लास्टिक पिशव्या बंद कराव्यात अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्लास्टिक वापरप्रकरणी सहा महिन्यात साडेनऊ लाख दंड आकारण्यात आला आहे.
– डॉ.आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापक, महापालिका

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago