नाशिक

घंटागाडी ठेकेदारांना 6 कोटींचा दंड

 

 

नाशिक : गोरख काळे

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने दीडशे कोटी खर्च करुन घंटागाडीचा ठेका दिला होता. दरम्यान वेळेत घंटागाडी न जाणे, ब्लॅक स्पॉटवरील कचरा न उचलणे, गाडीच घेउन न जाणे यासह विविध तक्रारीवरुन पालिकेने घंटागाडी ठेकेदारांना मागील सहा वर्षात 5 डिसेंबर 2016 ते 31 जुलै 2022 पर्यंत तब्बल 6 कोटी 22 लाख 18 हजार 2%% रुपये एवढी दंडात्मक कारवाइ करत दणका दिला आहे.

महापालिकेत लवकरच नव्याने घंटागाडी ठेका दिला जाणार आहे. विशेषत: मागील जुना घंटागाडीचा ठेका दीडशे कोटींपर्यत होता तोच ठेका आता साडे तीनशे कोटींपर्यत गेल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी हा पालिका वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान सध्या जुन्याच घंटागाडी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सिडको विभाग अंतर्गत सर्वाधिक 2 कोटी 15 लाख 1% हजार 230 एवढी दंडात्मक कारवाइ करण्यात आलेली आहे. त्याखालोखाल पंचवटी विभागात 1 कोटी %8 लाख 46 हजार 516 रुपये एवढ्या रकमेचा दंड केला आहे. घंटागाडीद्वार्रे शहरातील प्रत्येक घरातील कचरा घेणे आवश्यक आहे. तसेच जी वेळ ठरवून दिली आहे. तेव्हा घंटागाडी गेली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी असलेले कचर्‍याचे ढीग दररोज उचलणे, उद्यान, हॉटेल मधील कचरा उचलणे आदी ठिकाणचा कचरा उचलण्याची जबाबदारी घंटागाडी ठेकेदारांवर आहे. घंटागाडीला जीपीएस सिस्टीम असल्याने त्यानुसार काम सुरु असल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, पश्‍चिम, पूर्व महापालिकेच्या या सहाही विभागांमध्ये घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. कुठेही कचरा उघड्यावर दिसू नये, नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता त्यांना घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान पालिकेच्या घनकचरा विभागाने घंटागाडीबाबत आलेल्या तक्रारी आणि केलेल्या पाहणीत आढळून आलेल्या त्रुटींवरुन सहा कोटींचा दंड ठोठावला आहे.

 

 

चौकट….

 

विभागानुसार कारवाई

 

नाशिकरोड : 30 लाख 10 हजार %02

ना. पूर्व : 81 लाख 10 हजार 430

सातपूर  : 58 लाख 86 हजार 212

पंचवटी : 1 कोटी 78 लाख 46 हजार 596

सिडको : 2 कोटी 15 लाख 17 हजार 230

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

25 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

44 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

51 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

1 hour ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago