नाशिक

घंटागाडी ठेकेदारांना 6 कोटींचा दंड

 

 

नाशिक : गोरख काळे

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने दीडशे कोटी खर्च करुन घंटागाडीचा ठेका दिला होता. दरम्यान वेळेत घंटागाडी न जाणे, ब्लॅक स्पॉटवरील कचरा न उचलणे, गाडीच घेउन न जाणे यासह विविध तक्रारीवरुन पालिकेने घंटागाडी ठेकेदारांना मागील सहा वर्षात 5 डिसेंबर 2016 ते 31 जुलै 2022 पर्यंत तब्बल 6 कोटी 22 लाख 18 हजार 2%% रुपये एवढी दंडात्मक कारवाइ करत दणका दिला आहे.

महापालिकेत लवकरच नव्याने घंटागाडी ठेका दिला जाणार आहे. विशेषत: मागील जुना घंटागाडीचा ठेका दीडशे कोटींपर्यत होता तोच ठेका आता साडे तीनशे कोटींपर्यत गेल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी हा पालिका वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान सध्या जुन्याच घंटागाडी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सिडको विभाग अंतर्गत सर्वाधिक 2 कोटी 15 लाख 1% हजार 230 एवढी दंडात्मक कारवाइ करण्यात आलेली आहे. त्याखालोखाल पंचवटी विभागात 1 कोटी %8 लाख 46 हजार 516 रुपये एवढ्या रकमेचा दंड केला आहे. घंटागाडीद्वार्रे शहरातील प्रत्येक घरातील कचरा घेणे आवश्यक आहे. तसेच जी वेळ ठरवून दिली आहे. तेव्हा घंटागाडी गेली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी असलेले कचर्‍याचे ढीग दररोज उचलणे, उद्यान, हॉटेल मधील कचरा उचलणे आदी ठिकाणचा कचरा उचलण्याची जबाबदारी घंटागाडी ठेकेदारांवर आहे. घंटागाडीला जीपीएस सिस्टीम असल्याने त्यानुसार काम सुरु असल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, पश्‍चिम, पूर्व महापालिकेच्या या सहाही विभागांमध्ये घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. कुठेही कचरा उघड्यावर दिसू नये, नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता त्यांना घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान पालिकेच्या घनकचरा विभागाने घंटागाडीबाबत आलेल्या तक्रारी आणि केलेल्या पाहणीत आढळून आलेल्या त्रुटींवरुन सहा कोटींचा दंड ठोठावला आहे.

 

 

चौकट….

 

विभागानुसार कारवाई

 

नाशिकरोड : 30 लाख 10 हजार %02

ना. पूर्व : 81 लाख 10 हजार 430

सातपूर  : 58 लाख 86 हजार 212

पंचवटी : 1 कोटी 78 लाख 46 हजार 596

सिडको : 2 कोटी 15 लाख 17 हजार 230

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago