महाराष्ट्र

दिवाळी फराळाला महागाईच्या झळा

 

बजेट कोलमडले : नागरिकांचे निघणार दिवाळं

नाशिक : प्रतिनिधी

दिवाळी हा नवचैतन्याचा सण  आाहे.. दिवाळीच्या महिनाभर आधीपासून दिवाळीची तयारी करण्यात येते. अबालवृध्दापासून सगळ्यांनाच दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते. दिवाळीत तयार केल्या जाणार्‍या फराळी पदार्थाची उत्सुकता असते. मात्र यंंदा दिवाळीतील फराळी पदार्थालाही महागाईचा फटका बसला आहे.

दिवाळी फराळासाठी लागणारे चकली, चिवडा ,लाडू, करंजी,शंकरपाळे  पदार्थ केेले जातात. मात्र किराणाच्या दरात वाढ झाल्याने तयार फराळी पदार्थाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा खुमासदार फराळ खाण्यासाठी महागाईचा झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत.

पूर्वी दिवाळी फराळ बनवण्यासाठी घरातील सर्व महिला वर्ग एकत्र येत तयारी करत असत. आणि हितगुज साधत दिवाळी फराळाचे पदार्थ बनवत असत. पण काळ बदलला तसा महिलांही नोकरी करत असल्याने त्यांना ड्यूटीमुळे फराळ घरी बनवणे शक्य होत नाही.   त्यामुळे गेल्या काही वर्षात तयार फराळी पदार्थांना मागणी वाढली आहे. तयार फराळी पदार्थांना  वाढलेली मागणी लक्षात घेत अनेक बचत गटांकडून घरगुती फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. यंदाही घरगुतीपध्द्ीने बनवलेल्या फराळी पदार्थाना मागणी वाढली आहे.

 

तयार फराळी पदार्थ            1 कि. किंमत

चकली                             320

भाजके पोहे चिवडा              300

करंजी                             600

अनारसे                           600

बेेसन लाडू                        600

गोड शंकरपाळे                  350

तिखट शंकरपाळे                320

अनारसे पीठ                     220

हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज

 

Vaishali gosavi

यंदा खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने तयार फराळच्या किंमतीही      30 टक्कयांनी वाढल्या आहेत. किंमती वाढल्या असल्या तरी यंदा ग्राहकांची तयारी फराळी पदार्थांना मागणी अधिक आहे.

वैशाली गोसावी,( घरगुती फराळी पदार्थाचे व्यावसायिक    )

हेही वाचा : आरोग्यदायी दिवा

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago