नाशिक

मुंबई प्रवासासाठी दुहेरी टोलचा भुर्दंड

नाशिक : प्रतिनिधी
भिवंडी बायपासचा खोळंबा टाळण्यासाठी राज्य शासनाने बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असा समृद्धी महामार्ग कार्यान्वित करून नाशिककरांना जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली खरी. मात्र, नाशिककरांसाठी या महामार्गाचा लाभ सीमित राहिला आहे. नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर पोचण्यासाठी अद्याप सुस्थितीत आणि अधिकृत जोडरस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांना दोन टोलचा भुर्दंड सहन करावा
लागत आहे.
नाशिक शहर समृद्धी महामार्गाशी भरवीर मार्गातून जोडला जाणार होता. या मार्गासाठी भूमी अधिग्रहणही पूर्ण झाले असून, शेतकर्‍यांना भरपाई मिळालेली आहे. तथापि, या मार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या रस्त्यासाठी निविदा (टेंडर) प्रक्रिया सुरू केली होती, पण कोणत्या कारणास्तव ती प्रक्रिया रद्द करण्यात आली. याबाबत खुलासा होत
नाही.
प्रत्यक्षात हा मार्ग सिंगल टायर रोड (डांबरी रस्ता) आहे. तोे अरुंद असून, वाहनांच्या सुरक्षित व वेगवान प्रवासासाठी योग्य नाही. त्यामुळे वाहनधारकांना हा मार्ग टाळावा लागतो आणि पर्यायी मार्गाचा वापर करतानाच दुहेरी टोल भरावा
लागतो.

भरवीर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम त्वरित सुरू करावे
समृद्धी महामार्गाने राज्यात प्रगतीच्या नव्या संधी उघडल्या असल्या, तरी नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहराला अद्याप त्याचा पूर्ण लाभ घेता आला नाही. सुस्थितीत आणि अधिकृत जोडरस्ता नसेल तर संपूर्ण समृद्धी मार्गदेखील नागरिकांसाठी अधुरी सोय ठरते. त्यामुळे प्रशासन आणि राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरवीर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

निमा, आयमा करणार पाठपुरावा
या प्रश्नामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. निमा आणि आयमा या उद्योग संघटनांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डबल टोल हटवणे किंवा लवकरात लवकर जोडरस्ता पूर्ण करणे, यासाठी न्हाईसह शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे.

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

14 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

14 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

14 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

14 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

15 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

15 hours ago