Oplus_131072
महावितरणच्या कारभारामुळे वीजपुरवठा खंडित
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहराला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून भावली धरणातून शहरापर्यंत पाइपलाइन योजना केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात भावली धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे भावली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नगर परिषद व तळेगाव येथील जीवन प्राधिकरण तलावाचे पाणी शहराला कमी पडत असल्याने चार वर्षांपूर्वी भावली धरणातून ही योजना सुरू केली आहे. एप्रिलमध्ये नगर परिषद व तळेगाव येथील तलावातील पाणी आटल्याने आता केवळ भावली धरणातील पाण्याच्या भरवशावर इगतपुरीतील नागरिकांची भिस्त आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने शासनाच्या 38 कोटी निधीअंतर्गत नळपाणी योजनेचे काम केले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात भावली धरण परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…