महाराष्ट्र

निवडणूक आयोगाने नवीन प्रथा काढली : राज ठाकरे

मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. 14) राज्य निवडणूक आयोगावर टीका केली. अधिकृत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिल्यानंतर राज ठाकरे जोरदार कडाडले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सत्ताधारी महायुतीला निवडणुका जिंकण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गुरुवारी (दि. 15) होणार्‍या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला राज्य निवडणूक आयोग नियम बदलत आहे. काल सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका इतकी वर्षे आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार पाच वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी मतदान ही आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा होती. या सरकारला काय हवंय? याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढले. मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली? कुठून आली? ही काही कल्पना नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका गुरुवारी होणार आहेत. सार्वजनिक प्रचार संपल्यानंतर केवळ मर्यादित वैयक्तिक संपर्क साधण्याची परवानगी देण्याच्या आपल्या निर्णयाचा हवाला देत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या उमेदवारांना घरोघरी प्रचारादरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास आणि मोठ्या गटात फिरण्यास मनाई केली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, उमेदवार अजूनही मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करू शकतात, त्यासाठी व्यक्तींची संख्या पाचपेक्षा जास्त नसावी लाऊडस्पीकरचा वापर करू नये.
मुंबादेवीला विजयाचे साकडे- शिवतीर्थावरील बैठक संपल्यानंतर ठाकरे बंधू थेट मुंबादेवी मंदिराकडे रवाना झाले. यावेळी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरात विधीवत पूजा केल्यानंतर ठाकरे कुटुंबाने देवीचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकू दे आणि शिवसेनेच्या हाती सत्ता येऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध लढणार्‍या अनेक पक्षांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधूंचे एकत्रित दर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

पाडू नावाचे मशिन आणले
ही प्रथा आजच कशी अचानक आली? ही विधानसभा आणि लोकसभेच्या किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांना का नव्हती? ही आता कशासाठी आली? नव्याने या गोष्टी आणल्या जातात, त्या कशासाठी आणल्या जात आहेत? तसेच त्यांनी ’पाडू’ नावाची एक मशिन आणले आहे. प्रिंटिंग ऑब्झलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेले नाही. उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला पत्र गेले आहे. नवीन कोणते युनिट आणले? आम्हाला दाखवले नाही आणि लोकांनाही माहीत नाही. जनतेलाही माहीत नाही आणि नव्याने हे ईव्हीएम मशिनला लावणार आहात. हे काय मशिन आहे, ते दाखवावे. वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले. सरकारने निवडणूक आयोगाचा वाघ कधीच मारून टाकला आहे, असे म्हणत जे जुने नियम आहेत ते आताच का बाहेर काढलेत, असा प्रश्नसुद्धा केला.

Election Commission has introduced a new practice: Raj Thackeray

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago