मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. 14) राज्य निवडणूक आयोगावर टीका केली. अधिकृत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिल्यानंतर राज ठाकरे जोरदार कडाडले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सत्ताधारी महायुतीला निवडणुका जिंकण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गुरुवारी (दि. 15) होणार्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला राज्य निवडणूक आयोग नियम बदलत आहे. काल सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका इतकी वर्षे आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार पाच वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसर्या दिवशी मतदान ही आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा होती. या सरकारला काय हवंय? याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढले. मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली? कुठून आली? ही काही कल्पना नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका गुरुवारी होणार आहेत. सार्वजनिक प्रचार संपल्यानंतर केवळ मर्यादित वैयक्तिक संपर्क साधण्याची परवानगी देण्याच्या आपल्या निर्णयाचा हवाला देत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या उमेदवारांना घरोघरी प्रचारादरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास आणि मोठ्या गटात फिरण्यास मनाई केली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, उमेदवार अजूनही मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करू शकतात, त्यासाठी व्यक्तींची संख्या पाचपेक्षा जास्त नसावी लाऊडस्पीकरचा वापर करू नये.
मुंबादेवीला विजयाचे साकडे- शिवतीर्थावरील बैठक संपल्यानंतर ठाकरे बंधू थेट मुंबादेवी मंदिराकडे रवाना झाले. यावेळी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरात विधीवत पूजा केल्यानंतर ठाकरे कुटुंबाने देवीचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकू दे आणि शिवसेनेच्या हाती सत्ता येऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध लढणार्या अनेक पक्षांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधूंचे एकत्रित दर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
पाडू नावाचे मशिन आणले
ही प्रथा आजच कशी अचानक आली? ही विधानसभा आणि लोकसभेच्या किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांना का नव्हती? ही आता कशासाठी आली? नव्याने या गोष्टी आणल्या जातात, त्या कशासाठी आणल्या जात आहेत? तसेच त्यांनी ’पाडू’ नावाची एक मशिन आणले आहे. प्रिंटिंग ऑब्झलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेले नाही. उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला पत्र गेले आहे. नवीन कोणते युनिट आणले? आम्हाला दाखवले नाही आणि लोकांनाही माहीत नाही. जनतेलाही माहीत नाही आणि नव्याने हे ईव्हीएम मशिनला लावणार आहात. हे काय मशिन आहे, ते दाखवावे. वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले. सरकारने निवडणूक आयोगाचा वाघ कधीच मारून टाकला आहे, असे म्हणत जे जुने नियम आहेत ते आताच का बाहेर काढलेत, असा प्रश्नसुद्धा केला.
Election Commission has introduced a new practice: Raj Thackeray
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…