ई पिकपेरा अट रद्द न केल्यास तीव्र आंदोलन

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा.

लासलगाव:समीर पठाण

मागील दोन महिन्यापूर्वी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.त्यावर राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांना 350 रुपये क्विंटल अनुदान देताना अटी,शर्तीच्या आडून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले पाटील यांनी लासलगाव येथे केला आहे

राज्य सरकारने कांदा अनुदान जाहीर केल आहे त्यामध्ये ई.पीक पाहणी ही जाचक अट टाकलेली आहे
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सरकार ही अट रद्द करायला तयार नाही याचा निषेध नोंदवित महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले.या वेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करत कांदा अनुदान ईपीक पाहणी अट रद्द न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने रेल रोको रस्ता रोको करण्यात येईल अश्या तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा ईशारा देण्यात आला

शासनाकडून कांदा उत्पादकांना मिळणारे 350 रुपयाचे अनुदानासाठी शासनाने सातबारा उतार्‍यावर कांदा पिकाची ई पीक पाहणी करण्याची जी अट घालण्यात आली आहे.त्यामध्ये विविध अडथळे असल्याने शेतकऱ्यांना आपल्या सातबारा उतार्‍यावर रब्बी हंगामातील लाल कांद्याची पीक पेरा नोंदवणे शक्य झाली नसल्याने ती अट रद्द करण्याची मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

शासनाचा स्पष्ट जीआर आलेला आहे लाल कांद्याची खरीप नोंदणी झाली पाहिजे.त्यामुळे ही जाचक अट रद्दच झाली पाहिजे तरच शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होईल नाहीतर ९५ टक्के शेतकरी यापासून वंचित राहतील अशी माहिती राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले पाटील यांनी या वेळी बोलताना दिली.या वेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

13 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

14 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

14 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago