नाशिक

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

योजनेची माहिती पोहचवण्यात अपयश

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना काळात बंद पडलेली शेततळे योजना राज्य शासनाने पुन्हा सुरु केली आहे. शेतकऱ्यांसाठी वॉटर बॅक म्हणून समजली जाणारी शेततळे योजना कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने गुंडाळूली होती. ही योजना पुन्हा सुरु करावी, याकरिता मागील वर्षापासून पुन्हा ही योजना सुरु करण्यात आली. मात्र जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेततळे योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ही योजना पुन्हा सुरु झाली आहे, ही माहिती शेतकऱ्यापर्यत पोचवण्यात कृषी विभागाला विभागाला अपयश आल्याचे बोलले जात आहे.
कृषी विभागाने नाशिक जिल्हयाकरिता 2022-23 या वर्षाकरिता 605 शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहेे. मात्र  शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे आकडेवरुन दिसत आहे. मुळात शेततळे योजना सुरु झाली, ही माहीतीच शेतकऱ्यांपर्य न गेल्यानेच अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शेततळे योजनेसाठी जिल्हयातील पंधराही तालुक्यातून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळ्त असे. मध्यंतरी कोरोनात शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान महाविकास आघाडीने बंद करुन टाकले. त्यावेळी शेतकाऱ्यांनी मोठा विरोध या निर्णयाला  करत तसेच ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी सर्वच स्तरावर सुरु होती. अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेत ही योजना सुरु केली. विशेष म्हणजे आता या योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करुन 50 वरुन 75 हजारापर्यत रक्कम वाढ करण्यात आली आहे. नाशिक जिल्हयाला 605 शेततळ्यांचे उदिष्ट दिल्यानंतर अवघे 369 अर्ज आले. त्यातुन आता 173 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. दरम्यान शेततळ्याचे उदिष्ट पूर्ण होत नाही तोवर ऑनलाइन अर्ज सुरुच ठेवले जाणार आहे. येवला, बागालाण, चांदवड व नांदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज केले होते. 25 बाय 25 बाय 3, 30 बाय 25 बाय 3, 30 बाय 25 बाय 3, 30 बाय 30 बाय 3, 34 बाय 34 बाय 3 या पद्धतीने शेततळ्यांचे कामे केली जातात.

ऑनलाइन अर्ज घेणे सुरुच राहणार
शासनान 605 शेततळ्यांचे उदिष्ट दिले आहेत, त्यासाठी 369 जनांनी अऋज भरले. शेततळ्याचा फायदा घेण्यासााठी पुढच्या वर्षापर्यत अर्ज घेणे सुरुच ठेवले जाणार आहे. सध्या एक लॉटरी काढण्यात आली आहे. जयंत गायकवाड, विस्तार अधिकारी

लॉटरी निघालेल्या लाभार्थ्यांची संख्या
बागलाण – 26, चांदवड – 14, देवळा – 5, दिंडोरी – 9, इगतपुरी – 5, मालेगांव – 9, नांदगांव – 8, निफाड – 1, पेठ – 1, सिन्नर – 3, सुरगाणा – 1, त्र्यंबक- 3, येवला – 88

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago