त्र्यंबकेश्वर:
श्रीक्षेत्र ञ्यंबकेश्वर येथे पौष वारी निमीत्त लाखो वारकरी भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कुतार्थ झाले.सलग दोन वर्ष करोनाच्या संकटांने वारी झाली नाही यात्रा भरली नाही.या वर्षी मात्र दुप्पट उत्साहाने यात्रा संपन्न झाली आहे.मंगळवारी रात्री पर्यंत दिंडयांचे आगमन होत होते.जवळपास 500 दिंडया शहरात दाखल झाल्या आणि दशमीच्या रात्रीला ब्रह्मगिरीला जाग आली.हारीनामाने अवघा परिसर दुमदुमला.जागा मिळेल तेथे दिंडयाच्या राहुटया उभारल्या आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर होत राहीला.कुशावर्तावर स्नान करत मंगळवारी रात्री पासूनच वारकरी दर्शनबारीत उभे राहीले.काही ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गेले तर काही सकाळी ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचले.ञ्यंबक नगरी दोन दिवसांपासून भक्तीरसात नाहून निघाली आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…