आर्थिक वादातून गोळीबार
नाशिक : मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर गोविंदनगर बोगद्याजवळ बुधवारी (दि.४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चौघा मित्रांमध्ये आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गोळीबार करणारे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अविनाश विक्रम टिळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश टिळे आणि सुनील चोरमारे यांच्यात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता इंदिरानगर बोगद्याजवळ पैशांच्या देवाण घेवाण घेवणीवरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर भांडण झाल्याने संशयित सुनील चोरमारे व त्याचे साथीदार जगु सांगळे व राज जोशी यांनी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात अविनाश टिळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुनील चोरमारे, जग्गू सांगळे व राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…