आर्थिक वादातून गोळीबार
नाशिक : मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर गोविंदनगर बोगद्याजवळ बुधवारी (दि.४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चौघा मित्रांमध्ये आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गोळीबार करणारे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अविनाश विक्रम टिळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश टिळे आणि सुनील चोरमारे यांच्यात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता इंदिरानगर बोगद्याजवळ पैशांच्या देवाण घेवाण घेवणीवरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर भांडण झाल्याने संशयित सुनील चोरमारे व त्याचे साथीदार जगु सांगळे व राज जोशी यांनी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात अविनाश टिळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुनील चोरमारे, जग्गू सांगळे व राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

8 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

8 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

9 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

9 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

9 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

9 hours ago