नवी दिल्ली :
देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. भाज्यापासून ते इंधनापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अशात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेज जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेलाच्या आयातीवर निर्बंध लागले आहेत. दुसरीकडे इंडोनेशियाकडून होणार पामतेलाचा पुरवठा ठप्प झाल्याने खाद्यातेलाच्या किमतीत सतात वाढत आहे.
मॉस्कोकडून जूनपासून निर्यात शुल्कात वाढ
भारत सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सवलतींसाठी रशियाशी संपर्क साधणार आहे. रशियाकडून भारताला होणारा खाद्यतेलाचा साठा मर्यादित आहे. रशियाने 1.5 दशलक्ष टन सूर्यफूल तेल निर्यातीचा कोटा लागू केला आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत सूर्यफूल बियाण्यांच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. मॉस्कोने जूनपासून खाद्यतेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केल्याची माहिती भारतीय आयातदारांनी सरकारला दिली आहे. आयात शुल्क वाढल्यामुळे खर्च आणखी वाढू शकतो आणि परिणामी खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
भारत रशियाशी संपर्क साधणार
सूर्यफूल तेलाच्या आयातीवर सवलत मिळवण्यासाठी भारत सरकार लवकरच रशियाशी चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान खाद्यतेलाच्या देशांतर्गत किरकोळ किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे किंमती अजून वाढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
रशियाने 31 ऑगस्टपर्यंत सूर्यफूल तेलाची निर्यात मर्यादित केली आहे. यानंतर खाद्यतेल आयातीसाठी रशिया भारताला दरात सवलत देईल अशी भारताला आशा आहे. रशियातील सूर्यफूल तेलाची निर्यात 31 ऑगस्टपर्यंत 1.5 दशलक्ष टनांवर मर्यादित आहे. तर या कालावधीत सूर्यफूल बियांच्या विदेशात विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. रशियाने सूर्यफूल खाद्यतेल निर्यातीसाठी 700,000 टन साठा आहे.
एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत आणि रशियामध्ये या संदर्भातील चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, सर्व पर्याय खुले आहेत. यामुळे भारताला कमी शुल्क मिळण्याची अपेक्षा आहे.’ इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याने भारत रशियाकडून खाद्यतेल आयातीवर लक्ष केंद्रित करत आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago