46.41 टक्के साठा; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले असले, तरी गंंगापूर धरणाच्या पाणीपातळीत 2 टक्क्यांंनी वाढ झाली आहे.
सध्या गंगापूर धरणात 46.41 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आठवड्याला साधारणत: 3 टक्के जलसाठ्याचा उपयोग जिल्ह्यासाठी करण्यात येतो. किमान एक आठवड्याचा पाणीसाठा गंगापूर धरणात वाढल्याने संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मे महिना उजाडताच दरवर्षी पाणीउपसा व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होतो. यामुळे मे महिन्यापासूनच जिल्हा प्रशासनाकडून धरणातील साठ्याचे नियोजन करण्यात येते. यंदा मे महिन्यात अवकाळीने कहर केल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीव्र पावसाने हजेरी लावली. नाशिकसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळीचा पाऊस झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीतही वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 16) धरण पातळीत 2 टक्क्यांंनी वाढ होऊन पाणीपातळी 46.41 टक्क्यांंवर गेली. गत आठवड्यात सोमवारी (दि. 12 मे) 44.96 टक्के पाणीपातळी नोंदवली गेली होती.
येत्या 27 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये, तर महाराष्ट्रात साधारणत: 7 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सून वेळेत दाखल झाल्यास धरणसाठ्यात वेगाने वाढ होऊ शकते. यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मदत होईल. सध्या सर्वत्र अवकाळीने कहर केल्याने पावसाचे वातावरण आहे. ऐन मे महिन्यात अवकाळीने रौद्र रूप धारण केल्याने मे महिन्याचा उकाडा काही प्रमाणात नाहीसा झाला आहे.
यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी या धरणांतील साठाही वेगाने कमी होत आहे. याचबरोबर दारणा, नांदूरमध्यमेश्वर व चणकापूर धरणातील साठाही कमी झाल्याने पाणी जपून वापरावे, असेे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…