नाशिक

आता गुंठेवारी जमिनींचे व्यवहार करता येणार

नाशिक : प्रतिनिधी
तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आल्याने आता एक किंवा दोन गुंठे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना छोटे प्लॉट घेणे शक्य होणार असून, खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी निर्णयामुळे होणारा त्रास संपणार आहे. हा कायदा रद्द झाल्याने शेतकरी, मध्यमवर्गीय आदी घटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तुकडा बंदी कायदा रद्द करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती.
राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एनए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती. जमिनीचे तुकडे करूनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळे अशा घर आणि जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार नाइलाजाने बॉण्ड पेपरवर करारनामा पद्धतीने केले जात होते. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे. जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करून त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याची खरेदीही होत नव्हती. जमिनीचे लेआऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती अथवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत असे. मात्र, आता या कटकटीतून सुटका झाली आहे.

शेतकरीवर्गाची अडचण दूर झाली
या कायद्यामुळे शेतकरीवर्गाची मोठी अडचण झाली होती. अनेक शेतकर्‍यांना एक, दोन गुंठा जमीन विक्री करता येत नव्हती. तुकडा बंदी कायद्यामुळे ते शक्य होत नव्हते. याप्रकरणी आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. अखेर औरंगाबाद खंडपीठाकडून तुकडा बंदी रद्द करण्यात आल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
– रमेश औटे, जनरल सेक्रेटरी, बहुजन शेतकरी संघटना, ना. रोड

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago