नाशिक

आता गुंठेवारी जमिनींचे व्यवहार करता येणार

नाशिक : प्रतिनिधी
तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आल्याने आता एक किंवा दोन गुंठे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना छोटे प्लॉट घेणे शक्य होणार असून, खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी निर्णयामुळे होणारा त्रास संपणार आहे. हा कायदा रद्द झाल्याने शेतकरी, मध्यमवर्गीय आदी घटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तुकडा बंदी कायदा रद्द करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती.
राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एनए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती. जमिनीचे तुकडे करूनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळे अशा घर आणि जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार नाइलाजाने बॉण्ड पेपरवर करारनामा पद्धतीने केले जात होते. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे. जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करून त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याची खरेदीही होत नव्हती. जमिनीचे लेआऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती अथवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत असे. मात्र, आता या कटकटीतून सुटका झाली आहे.

शेतकरीवर्गाची अडचण दूर झाली
या कायद्यामुळे शेतकरीवर्गाची मोठी अडचण झाली होती. अनेक शेतकर्‍यांना एक, दोन गुंठा जमीन विक्री करता येत नव्हती. तुकडा बंदी कायद्यामुळे ते शक्य होत नव्हते. याप्रकरणी आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. अखेर औरंगाबाद खंडपीठाकडून तुकडा बंदी रद्द करण्यात आल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
– रमेश औटे, जनरल सेक्रेटरी, बहुजन शेतकरी संघटना, ना. रोड

Bhagwat Udavant

Recent Posts

सिंहस्थाच्या तारखा जाहीर, या तारखेला पाहिले अमृत स्नान

नाशिक: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत…

2 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

4 hours ago

मनमाड रेल्वे स्टेशनवर तरुणाचे भलतेच धाडस

मनमाड : आमिन शेख मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना…

7 hours ago

फॅशन वीकचे 5 टॉप ट्रेंड्स

फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्‍यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…

1 day ago

स्टायलिश फुटवे

1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…

1 day ago

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…

1 day ago