नाशिक

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त

नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील भरोसा सेलला जानेवारी ते मेअखेर अशा पाच महिन्यांत एकूण 341 कौटुंबिक वादाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात 53 अर्ज वरिष्ठ पातळीवरील, तर 288 अर्ज स्थानिक पातळीवरील आहेत. दोन्ही अर्जांतील 22 महिला नांदण्यास गेल्या असून, त्यांचा संसार फुलला आहे.
जानेवारी ते मे या कालावधीत वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या 53 पैकी 8 अर्जांत महिलांनी नांदण्याचा निर्णय घेतला, सात प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली. 15 प्रकरणे निकाली काढली. 47 प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.
एकही प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेलेले नाही. स्थानिक पातळीवरील 288 अर्ज दाखल झाले असून, 14 प्रकरणांत महिलांनी पतीकडे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 13 प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. 12 प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. 39 प्रकरणांत निर्णय घेऊन निकाली काढण्यात आले आहेत. 249 प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. नाशिक शहरातील महिलांच्या कौटुंबिक तक्रारींची संख्या चिंताजनक आहे. मात्र, महिला सुरक्षा शाखेचा भरोसा सेल या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी असल्याने अधिक तत्परतेने उपाययोजना करण्याची गरज आहे. पुण्याचे हुंडाबळी प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ, संशय, घरगुती हिंसाचार, वादाची प्रकरणे बाहेर येत असल्याचे भरोसा सेलकडील आकडेवारीवरून दिसते.
कौटुंबिक वाद, अत्याचार, मारहाण, संशय आदी कारणांमुळे भरोसा सेलकडे महिलांनी धाव घेतली आहे.
कुटुंबात होणारा त्रास सहन करण्यापलीकडे जात असेल तरी महिला पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत. अशावेळी भरोसा सेलची मदत घेऊन त्या संसार सावरू शकतात. त्यामुळे महिलांनी आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी, कौटुंबिक कारणामुळे आयुष्य संपवण्यापूर्वी एकदा महिला सुरक्षा सेलला भेट द्यावी, असे आवाहन महिला सुरक्षा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी केले आहे.

                                                                                                                      नाशिक ः देवयानी सोनार

आकडे बोलतात…
22 : महिला नांदण्यास गेल्या
20 : प्रकरणे न्यायालयात
12 : प्रकरणांत गुन्हे दाखल
54 : प्रकरणे निकालात
296 : प्रकरणे प्रलंबित

 

कौटुंबिक तक्रारींत जीवन संपवण्यापूर्वी

भरोसा सेलला एकदा भेट दिल्यास

नक्कीच चांगला मार्ग निघू शकतो.
                                                – आम्रपाली तायडे,
                                                              पोलिस निरीक्षक,
                                                                    महिला सुरक्षा सेल

                                                                                                                   

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

13 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

13 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

13 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

13 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

14 hours ago

दिल पे मत ले यार..!

टेन्शन, डिप्रेशन आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचललं जाणारं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला…

14 hours ago