नाशिक

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार

तासाभरात 17 मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक ः प्रतिनिधी
आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही (दि. 6) सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली.
साधारणतः तासभर झालेल्या मुसळधारेमुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून आकाश निरभ्र होते. दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी पाचनंतर अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधारेला सुरुवात झाली. तासभर झालेल्या पावसात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाकडून दोन दिवसांचा यलो अलर्ट नाशिक जिल्ह्याला दिला होता. त्यानुसार सलग दोन दिवस शहरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. मे महिन्यात जिल्ह्यासह शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

सखल भागात पाणी

शहरात तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अवकाळीने जर शहरात ठिकठिकाणी पाणी साचत असेल तर ऐन पावसाळ्याच्या दिवसांत काय स्थिती होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्यावर परिणाम

वातावरणात सतत बदल जाणवत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. सकाळी ऊन, तर सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्री वातावरणात गारवा निर्माण होत आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी यांसारख्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

6 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

7 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

7 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

7 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

7 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

7 hours ago