दिंडोरीत नागरिकांचा सवाल, रास्ता रोको; बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
दिंडोरी : प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्यात वनारवाडी येथील युवतीचा बळी जाऊन महिना होत नाही, तर दिंडोरी येथील पाच वर्षीय रुद्र अमोल जाधव यास घराजवळून आजोबांच्या हातातून बिबट्याने झडप घालून बळी घेतला. या घटनेनंतर अजून किती बळींची वाट बघणार, असे म्हणत संतप्त नागरिकांनी शनिवारी मध्यरात्री माजी आमदार धनराज महाले यांच्यासह सुमारे चार तास रास्ता रोको करत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
वनविभागाच्या अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत तीव्र भावना व्यक्त करत वेळीच उपाययोजना करा; अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिला. दिंडोरी येथे निळवंडी रोडलगत दत्तू जाधव यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्तू जाधव यांच्या हातातून त्यांचा नातू रुद्र जाधव यास बिबट्याने झडप घातली. त्यात गंभीर जखमी होत रुद्र मयत झाला. अधिकार्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी बैठक घेत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणे, विविध उपाययोजनेसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, परिसरात बिबट्या शोधमाहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक उमेश वावरे यांनी दिले. पहाटे पोलीस उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांची समजूत काढत बैठकीचे
भक्ष्य नसल्यावर बिबट्या कसा अडकणार?
तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, अनेक पिंजर्यांत भक्ष्यच वनविभागाकडून टाकले जात नाही. भक्ष्यच नसेल तर बिबटे पिंजर्यात कसे येतील, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात वाडीवस्तीवर अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी वीजपुरवठा बंद असतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दिंडोरीच्या घटनेवेळी लाइट गेले होते. घराबाहेर रस्त्यावर येताच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डाव साधला. आतातरी रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
आश्वासन दिले.
सत्तर गावांत बिबट्याची दहशत
तालुक्यातील सुमारे सत्तर गावांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत असून, दररोज त्यांचा उपद्रव वाढत आहे. कुठे कुत्रे, मांजर, गाय, वासरू, शेळी, मेंढी आदी जनावरांवर हल्ले होत असताना, तालुक्यात डझनहून अधिक बालकांवर हल्ले झाले. त्यात त्यांना जीव गमवावा लागला. दिंडोरी तालुक्यात महिन्यात झालेल्या दुसर्या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण असून, वनविभाग प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करणार की, अजून किती बळी जाण्याची वाट बघणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
वनविभागाची सर्च मोहीम फेल
वनारवाडी येथे युवतीवर केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विशेष सर्च मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. मात्र, ही मोहीम प्रभावीपणेे राबविण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ड्रोन कॅमेर्यात अधिक बिबटे दिसत असले तरी एक बिबट्या पिंजर्यात अडकल्यावर मोहीम थंड झाली अन् बिबट्याने बालकावर हल्ला केल्याची चर्चा आहे. वनविभागाने अॅॅक्शन मोडवर येत विशेष सर्च मोहीम राबविण्याची मागणी आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…