उत्तर महाराष्ट्र

‘प्रेमसागर’मधील निरागसता भावली : प्रा. डॉ. वृंदा भार्गवे

नाशिक : प्रतिनिधी
शीला जोशी यांच्या ‘प्रेमसागर’ कथासंग्रहातील लेखन स्वानुभवावर आधारित असून, त्यातील निरागसता मनाला भावली. जुन्या पिढीतील स्मरण रंजन व कौटुंबिकता वाचकांना आवडेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. ‘प्रेमसागर’ या कथा व ललित लेख संग्रहाचे प्रकाशन प्रा. भार्गवे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सतीश कुलकर्णी, लेखिका शीला जोशी, प्रकाशक पद्माकर देशपांडे, प्रा.पी.के. कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यातील सहभागाबद्दल अभिनंदन करून भावी काळात लेखिका चालू काळातील घडामोडींवर चिंतन करतील, अशी अपेक्षा प्रा भार्गवे यांनी व्यक्त केली. दीपक रत्नपारखी यांनी लेखिकेचा परिचय करून दिला. शैलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले तर शलाका दहाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास हरिभाऊ कुलकर्णी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कवी उल्हास गायधनी, राजेश कुलकर्णी यांच्यासह चांदवड मर्चंट बँक अध्यक्ष अशोक व्यवहारे व नागरिक उपस्थित होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 hour ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 hour ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

2 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

2 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

2 hours ago