नाशिक : प्रतिनिधी
शीला जोशी यांच्या ‘प्रेमसागर’ कथासंग्रहातील लेखन स्वानुभवावर आधारित असून, त्यातील निरागसता मनाला भावली. जुन्या पिढीतील स्मरण रंजन व कौटुंबिकता वाचकांना आवडेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले. ‘प्रेमसागर’ या कथा व ललित लेख संग्रहाचे प्रकाशन प्रा. भार्गवे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सतीश कुलकर्णी, लेखिका शीला जोशी, प्रकाशक पद्माकर देशपांडे, प्रा.पी.के. कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यातील सहभागाबद्दल अभिनंदन करून भावी काळात लेखिका चालू काळातील घडामोडींवर चिंतन करतील, अशी अपेक्षा प्रा भार्गवे यांनी व्यक्त केली. दीपक रत्नपारखी यांनी लेखिकेचा परिचय करून दिला. शैलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले तर शलाका दहाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास हरिभाऊ कुलकर्णी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कवी उल्हास गायधनी, राजेश कुलकर्णी यांच्यासह चांदवड मर्चंट बँक अध्यक्ष अशोक व्यवहारे व नागरिक उपस्थित होते.
सिडको विशेष प्रतिनिधी -चुंचाळे अंबड भागातील म्हाडा कॉलनी येथे दोन दिवसापूर्वी येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन…
माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत! गणेश मंडळाना भेट देऊन केली महाआरती...! नांदगाव:…
मनमाडला ठेकेदाराकडुन दिवसाढवळ्या वीज चोरी करून काम सुरु...! महावितरण कारवाई करेल का..? मनमाड: प्रतिनिधी महावितरण…
शिंदेगावात फटाक्याच्या कंपनीला भीषण आग नाशिकरोड : प्रतिनिधी देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते…
सावरकर नगर भागातील धोकादायक ट्रान्सफार्मरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात नाशिक: प्रतिनिधी सातपूरच्या सावरकर नगर भागातील निलकंठेश्वर…
नाशिक: प्रतिनिधी पंचवटी कारंजा परिसरात रात्री एकाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना घडली.…