मनमाड-मुंबई समर एक्सप्रेस मध्ये भाजीपाला लोड करण्यासाठी मिळाला तीन मिनिटांचा अतिरिक्त वेळ
वेळ वाढवण्याच्या मागणीला अनेक संघटनांना यश
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
लासलगाव प्रतिनिधी
मनमाड पासून सुटणाऱ्या सीएसएमटी स्टेशन मुंबई पर्यंत जाणाऱ्या 02102 क्रमांकाची ट्रेन लासलगाव येथे एक मिनिट थांबत होती त्यामुळे भाजीपाला आणि शेतमाल लोडिंग साठीचा परवाना लासलगाव स्टेशन वरून मिळत नव्हता.सदरच्या बाबीमुळे अनेक व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल मुंबईकडे घेऊन जाता येत नव्हता.रेल्वे थांबण्याची वेळ ही एक मिनिटापासून वाढून तीन मिनिटे केल्यास भाजीपाला वाहतुकीचा परवाना मिळू शकतो म्हणून गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक संघटना रेल्वे प्रशासनाकडे तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा करत होत्या त्या मागणीला यश आले आणि रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वेची थांबण्याची वेळ ही तीन मिनिट केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि शेतकरी लासलगाव कडून मुंबईकडे भाजीपाला आणि शेतमाल पाठवू शकतील.
या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर व्यापारी,संघटनेचे बाळासाहेब सोनवणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर तसेच केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे प्रयत्न आणि पाठपुरावा केला.सदर पाठपुरावाला यश आले.या कामी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील मदत घेण्यात आली.
या प्रसंगी मागणीकर्त्यांनी शेतमालाचे पूजन करून लोडिंग केले.या वेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन होळकर,माजी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना नेते शिवा सुरासे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर गावडे,व्यापारी असोसिएशनचे बाळासाहेब सोनवणे,शिवाजी शिंदे,हरीश गवळी,हमीद शेख,प्रेम सोनवणे,रेल्वे प्रशासन आरसीएफ गवई,स्टेशन मॅनेजर पांडे,पार्सल पर्यवेक्षक जोशी आदी उपस्थित होते.सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मानसपुरे यांचे सचिन होळकर यांनी दूरध्वनीद्वारे आभार मानले.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…