नाशिक

नायलॉन मांजाचा जीवघेणा खेळ थांबवा

 

सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांचे आहावन

नाशिक : प्रतिनिधी

शहरात नुकतीच संक्रात झाली. मात्र यावेळीही नेहमीप्रमाणे बंदी केलेला व घातक असलेला नायलॉन मांजाचा बेसुमार वापर करताना अनेकजन दिसून आले. शहरातील गच्या, मैदानांवर हा घातक नायलॉन बिनधास्त वापरला जात होता. मात्र हा मांजा आता पक्षांच्या जीवावर बेतत आहे. शहरातील विविध भागात नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कायमस्वरुपी कठोर कारवाइ करून अशा व्यक्तींवर संक्रात आणावी. अशी मागणी नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते तुळ्शीदास इंगळे यांनी केली आहे.

 

हौसेपोटी अनेकजन पंतग उडवत असले तरी,आपल्या एका कृतीने नागरिक व पशु पक्ष्यांवर काय परिणाम होतो आहे. याचा विचार नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांनी आणि तो वापरणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. शासनाकडून संक्रात च्या वेळी काही ठिकाणी कारवाइ केली जाते. मात्र सरसकट नायलॉन मांजा हद्दपार होत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आता मांजाविरोधात लोकचळ्वळ व्हायला हवी. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती होणे महत्वाचे आहे. सध्या याविषयी केवळ पर्यावरण, वन्यजिव प्रेमी यांच्याकडूनच प्रयत्न होताना दिसतात. या चळ्वळीत सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होणे असल्याचे मत इंगळे यांनी केले आहे. दरम्यान मकरसंक्रांत झाल्यानंतरही शहरातील नाशिकरोड, जेलरोड सह सर्व शहरात पतंग कटल्यानंतर हा मांजा अद्यापही झाडे, तारा, गच्चीवर लोंबकळत दिसतो आहे. त्यात पक्षी अडकून जखमी होत आहेत. काही ठिकाणी प्राणी, नागरिक जखमी देखील जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या. शनिवारी लहान मुलगा याच मांजामुळे जखमी झाल्याचा प्रकार घडला. प्रशासनाने या मांज्यावर नियंत्रणासाठी कठोर होउन कडक अंमलजबाजवणी करावी. नायलॉन मांजावर महाराष्ट्रासारख्या एकट्या राज्यात बंदी घालून उपयोग नाही. तर देशभरात त्याच्या उत्पादनावरच बंदी घालावी. अशी मागणी तुळशीदास इंगळे यांनी केली आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago