जऊळके दिंडोरी येथील कंपनी आगीत भस्मसात
दिंडोरी: प्रतिनिधी
तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथे काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत लाखोचा माल भस्मसात झाल्याची घटना पहाटे घडली आहे. जउळकेदिंडोरी येथील सरस्वती नगर मधील संदेश किशोर गुप्ता यांच्या मालकीचे रेखान ऍग्रो या काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आज शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत लाखोचा कच्चामाल जळाल्याची घटना घडली.आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली .जानोरी चे कामगार तलाठी किरण भोये व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…