भारतनगर भागातील खळबळजनक घटना
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले खुनाचे सत्र सुरूच असून आज मध्यरात्री प्रेमप्रकरणातून भारत नगर येथे एका युवकाची धारदार शस्रने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, सागर रावतर असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सहाजण ताब्यात घेतले आहेत. प्रेम संबंधावरून झालेल्या वादात मध्यस्थी केल्यामुळे तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड आहेत. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी भोये याचे परिसरातच राहणाऱ्या एका मुलीशी प्रेम संबंध होते, त्या मुलीशी भोये याचे सतत भांडण होत या भांडणात मृत युवक मध्यस्थी करायचा. त्या रागातून या युवकाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…