आठ गावच्या पाणीयोजनांना मिळाली संजीवनी
सिन्नर : प्रतिनिधी
पश्चिम पट्ट्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी (दि. 19) दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोनांबे आणि ठाणगावच्या वरच्या बाजूला असलेले उंबरदरी ही दोन्ही धरणे ओव्हर-फ्लो झाली आहेत. सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच ही दोन्ही धरणे जूनच्या मध्यातच ओव्हरफ्लो झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्याची जीवनदायिनी असलेली देवनदी आणि पश्चिम पट्ट्यात उगम पावणारी म्हाळुंगी नदी प्रवाही झाली आहे. गेल्या वर्षी 27 आणि 28 जुलै रोजी धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा तब्बल सव्वा महिना अगोदरच ही दोन्ही धरणे भरून देवनदी आणि म्हाळुंगी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने या दोन्ही धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साठा झाला होता.
कोनांबे धरणावर कोनांबे, सोनांबे, सोनारी येथील पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, या योजनांना धरण ओव्हरफ्लो झाल्याने तीन गावच्या पाणीयोजनांना संजीवनी मिळाली आहे. देवनदीवरून राबवण्यात आलेली कुंदेवाडी – सायाळे ही पूरचारी योजना पूर्ण झाल्याने पूर्व भागातील शेतकर्यांच्या नजरा पूरपाण्याकडे लागल्या आहेत. धरणाच्या वरच्या भागातील धोंडबार, औंढेवाडी शिवारातील बांध, बंधारे भरल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन कोनांबे धरणाच्या सांडव्यातून पडलेले पाणी देवनदीद्वारे पूर्व भागाकडे झेपावले. मे महिन्यात झालेल्या पावसाने वाहणार्या नदीच्या प्रवाहात आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसात धरण 28 जुलै रोजी भरले होते. तुलनेत यंदा धरण सव्वा महिना अगोदर ओव्हरफ्लो झाले. यंदा पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे पूर्व भागातील शेतकर्यांना देवनदी जोरदार प्रवाही होण्याची अपेक्षा लागून होती. कोनांबे धरण ओव्हरफ्लो झाल्याने देवनदी काठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसाने उंबरदरी धरण निम्मे भरले होते. बुधवारी रात्री आणि गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले. उंबरदरी धरणावर ठाणगांवसह 5 गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरण भरल्याने या पाच गावांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे. शिवाय, म्हाळुंगी नदी प्रवाही झाल्याने भोजापूरच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
दुष्काळी गावांत लवकर मिळणार पाणी
गेल्या वर्षी शेवटच्या चरणात जोरदार पाऊस झाल्याने देवनदीचे पाणी पूरचारीतून पूर्व भागातील गावांना मिळाले होते. कुंदेवाडी – सायाळे या बंदिस्त पूरचारीचे काम 36 किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तर खोपडी – मिरगाव पूरचारीचे कामही बर्यापैकी पूर्ण झाले आहे. मे महिन्यात झालेल्या पावसाने देवनदी खळाळून पाणी दातलीच्या पुढे गेले होते. आता प्रवाहात जोराची वाढ झाल्याने अल्पावधीतच देव नदीचे पूरपाणी सांगवी येथे गोदावरीला जाऊन मिळेल. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी जुलै महिन्यात किंवा तत्पूर्वीच पूर्व भागातील दुष्काळी गावांना मिळण्याची अपेक्षा बळावली आहे.
कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…
पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…
ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…
एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…