उत्तर महाराष्ट्र

कुळवंडी बंधार्‍याने 10 गावांचा दुष्काळ संपणार

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : पेठ तालुक्यातील कुळवंडी येथे बंधारा बांधण्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणाचा दहा गावांना फायदा होणार असून, तालुक्याची सिंचन क्षमता 230 हेक्टरने वाढणार आहे. या प्रकल्पामुळे कुळवंडी शिवारातील गावांचा 20 वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार असल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

बंधार्‍याच्या कामाचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी नारायाण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, सचिन खंबाईत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला हरिभाऊ गिते यांची मदत होणार आहे. त्यांना कामाची पध्दत माहिती असल्याने  प्रत्येक टेबलविषयी त्यांना इंथभूत माहिती आहे. त्यामुळे तत्वाला काम मार्गी लागते. त्यांच्याकडे एक काम दिले होते. त्यांनी आठ दिवसांत ते काम मार्गी लावले. त्यांच्यासारखा अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुळवंडीचा या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह कृषी सिंचनासअठी जवळपास 69.26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे कुळवंडीसह घनशेतपाडा, हट्टीपाडा, नाईकपाडा, निमोणीपाडा, कडवईपाडा, बर्डापादा व गावंद येथील गावांना पाणी मिळेल. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. आमदार नरहरी झिरवाळ हेच मतदारसंघाचे पाणदेव असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नगराध्यक्ष करण करवंदे, मनोहर चौधरी, गोकुळ झिरवाळ, गिरीश गावित, रामदास गवळी, हिरामण पवार, मोहन गावंडे, हनुमंत गवळी, गणेश गवळी आदी उपस्थित होते.

 

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये

पाणलोट क्षेत्र : 4.95 चौरस किलो मिटर

साठवण क्षमता : 69.26 दशलक्ष घनफूट

सिंचन क्षमता : 230 हेक्टर

धरणाची उंची : 29.24 मीटर

धरणाची लांबी : 375 मीटर

सांडव्याची रुंदी : 56 मीटर

कालवा लांबी : 2 किलो मिटर

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

13 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

14 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

14 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago