महाराष्ट्रातील जनतेवर
भारनियमनाचे संकट
मुंबई : सुमारे दहा वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनतेवर भारनियमनाचे संकट आले आहे.
महावितरणने भारनियमन लागू होत असल्याची घोषणा केली आहे. देशभरात विजेची मागणी वाढली असून, अनेक राज्यांमध्ये जनतेलाभारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुर्या वीज निर्मितीमुळे सुमारे 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे.
फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटा येत असून, औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल 4000 मेगावॅटने वाढ झालेली आहे. महावितरणची विजेची मागणी तब्बल 24500 ते 24800 मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख पाहता, ही मागणी 25500 मेगावॅटवर लवकरच जाण्याची शक्यता आहे. रात्री कालावधीत देखील 225000 ते 23000 मेगावॅट विजेची मागणी आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…