नाशिक

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

 

उपमुख्यमंत्री फडणवीसः  एक लाख कोटींचा खर्च

नाशिक : प्रतिनिधी

पश्‍चिमी वाहिनीचे पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते. मात्र, आता हे पाणी मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. यासाठी पाचशे किमीचे टनेलद्वारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणले जाईल. विदर्भातही पूर्व भागातून पश्‍चिम विदर्भात याच पद्धतीने वाहून जाणारे पाणी वळवले जाणार आहे. याद्वारे महाराष्ट्रासह मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न असेल. यासाठी एक लाख कोटीचा खर्च असला तरी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प बोलून

दाखवला.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, 2019 नंतर त्यांनी कुठल्याही प्रकल्पासाठी प्रयत्न केले नाही. त्यांनी सांगावे की, आम्ही राज्यासाठी काय केले. 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना पश्‍चिमी वाहिन्यांद्वारे वाहणारे पाणी मराठवाड्याकडे आणण्याकरिता काय करता येईल, याचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार केला. त्यासाठी जल मंडलाची मान्यता घेतली. नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र या फाइलीवरील धूळही झटकली नाही. यांना सही होती, की समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून प्रकल्प मार्गी लावण्याची. केवळ डीपीआर करून मंजुरी मिळवायची होती. मात्र, त्यांना ते करायचे नव्हते. आमचे सरकार पुन्हा येताच याचवर्षी या प्रकल्पाची निविदा काढून हे पाणी गोदावरी खोर्‍यात आणायचे ठरवले आहे. नाशिक-नगर-मराठवाड्यात पाण्यावरुन होणारा संघ्रर्ष देखील यातून टाळला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात नळगंगा, वैनगंगाच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी वळवून पूर्व विदर्भाचे पाणी पश्‍चिम विदर्भात आणायचे आहे. या प्रकल्पांमुळे खर्‍या अर्थाने राज्यात जलक्रांती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा निर्णय फडणवीस यांनी म्हटले. कोल्हापूर व सोलापूरमध्ये दरवर्षी येणारा पूर रोखण्याकरिता जागतिक बॅकेशी बोलणे सुरू असून, या शहरातील पुराचे पाणी वळण बंधार्‍याचे पाणी तसेच टनेल व उजनीच्या माध्यमातून दुष्काळी मराठवाड्यात वळवण्यासाठी काम करणार आहोत.

नाशिक निओ मेट्रोचे प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यात

नाशिकमध्ये लवरकर नियो मेट्रो येणार आहे. पुढच्या आठवड्यात प्रेझेंटेशन केले जाणार आहे. नियो मेट्रो मेक इन इंडिया तत्त्वावर सुरू होणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाली असून, मेक इन इंडिया प्रोग्रामद्वारेच या ट्रेनची निर्मिती लातूर येथेच केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

14 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

14 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

14 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago