नाशिक

जिल्हा साहित्यिक मेळाव्याचा शुभारंभ

 

 

साहित्याला कटूता न बाळगता दाद द्या : प्रदीप निफाडकर

नाशिक : प्रतिनिधी

 

साहित्यिकांनी एकमेकांच्या लेखनाविषयी ,साहित्याविषयी कोणत्याही प्रकारची कटूता मनात न ठेवता दाद द्या असे प्रतिपादन गझलकार आणि कविता संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी केले.

 

जिल्हा 53 व्या  साहित्यिक मेळावा काल (दि.1) शनिवार रोजी मु.श.औरंगाबाद सभागृहात पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन  संजय वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी  साहित्य मेळाव्याच्या अध्यक्ष  वंदना अत्रे  , उद्घाटक  संजय वाघ ,सावाना अध्यक्ष दिलीफ फडके ,सुनिल कुटे,धर्माजी बोडके ,वैद्य विक्रांत जाधव,गिरीश नातू , जयप्रकाश जातेगावकर,शंकर बोऱ्हाडे आदि मान्यवर उपस्थित होते .

 

निफाडकर म्हणाले ,नाशिकला साहित्यिकांची मोठा वारसा  आहे.  मराठी भाषेला समृध्द परंपरा  आहे. मराठी भाषेने  इतर भाषेतून अनेक गोष्टी घेत समृद्ध वाटचाल केली.  मराठी भाषेत 89 कविता प्रकार आहेत. एवढे कविता प्रकार कोणत्याच भाषेत आढळणार नाहीत. इतर भाषेतले कवितेचे प्रकार घेऊन आपण आपल्या कविता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.

कवितेच्या विविध  प्रकाराविषयी कार्यशाळा घ्यायला हवी त्यातून नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन मिळेल असे  मनोगत त्यांनी व्यक्त केले.

 

संजय वाघ  म्हणाले,

सावाना महाराष्ट्रासाठी भूषणावह  संस्था आहे. सावानाची  ग्रंथसंपदा पावने दोन लाख आहे.

समाजाला दिशा दर्शविण्यात काम साहित्यिक करतात..

समाजासाठी जे योग्य आहे,ते आपल्या लेखनातून मांडण्यात  काम लेखकांनी कराव.ज्वलंत विषयावर असलेले वास्तववादी साहित्य वाचकांना आवडत.

साहित्य समाजाचा आरसा असते.

काळानुरूप प्रत्येक गोष्टीच  मार्केटिंग करण्यास महत्त्व आल आहे. मार्केटिंग आणि पुरस्कारात   रमण्याऐवजी साहित्यात योगदान द्याव.

लहान मुलांच भावविश्व बदलल आहे. त्यामुळे बालसाहित्य लेखन करताना आजच्या मुलांच्या भावविश्वाचा विचार करायला हवा. लहान मुल

मराठी  बोलताना आणि लिहताना मुल  कमी पडतात. त्यासाठी पालकांनी आणि मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

 

 

वंदना अत्रे म्हणाल्या,

गझलला इश्क आणि मदीरातून बाहेर काढण्याचे काम  ..गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले तर . लहान लेकरांच्या एकाकीपणाची काळजी घेत त्यांचा  एकाकीपणा घालवण्यासाठी  संजय वाघ यांनी आपल्या बाल साहित्यातून प्रयत्न केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

दिलीप फडके यांनी यावेळी  आपले मनोगत व्यक्त केले.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पार पडलेल्या 53 व्या जिल्हा साहित्य मेळाव्याला साहित्यिकांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचे प्रस्तावित संजय करंजकर यांनी केले. तर आभार गणेश बर्वे यांनी मानले .

 

कवि संमेलन रंगले

 

कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर  दोन वर्षानी भरलेल्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याला  साहित्यिकांनी  गर्दी केली होती. यावेळी रंगलेल्या कवि संमेलनात साहित्यिकांनी विविध कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago