मृतदेह जाळला ग्रामपंचायत कार्यालयासमोर
चांदवड वार्ताहार
तालुक्यातील खडकजांब येथे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न चिघळला असून या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु असल्याने दोन स्मशानभुमी असून रस्ता नसल्याने हा वाद मिटत नसल्याने खडकजांब येथील ग्रामस्थांनी संतप्त होत मृतदेह आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळला . याबाबत काल खडकजांब येथील आदिवासी तरुण अमोल अशोक कोकाटे ( 25) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास मच्ंिछंद्र कराड हे करीत आहेत. दरम्यान या खडकजांब येथील स्मशानभुमीचा प्रश्न गेल्या आठ ते दहा महिन्यापासून चांगला गाजत आहे. याप्रकरणी काही नागरीकांनी स्मशानभुमीला रस्ता नसल्याने उपोषण केले . तहसीलदार कार्यालय व वरिष्ठाकडे ही बाब असतांना या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु आहे. नवीन स्मशानभुमी बांधली मात्र तेथेही जाण्यासाठी रस्ता नसल्याने या तरुणांचा मृतदेह ग्रामस्थांनी संतप्त होत दि. 16 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळला यावेळी सरपंच पुजा अहिरे, उपसरपंच नाना गुंजाळ, ग्रामसेवक अजय पुरकर व ग्रामपंचायत सदस्यांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळु नये अशी विनंती केली मात्र संतप्त ग्रामस्थांनी अखेर मृतदेह ग्रामपंचायती समोरच जाळल्याने काही काळ वातावरण चांगले तापले होते.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…