महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये जयश्री जाधवांची विजयश्री

भाजपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव
कोल्हापूर : कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी अठरा हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. भाजपाने या निवडणुकीसाठी मोठी ताकद पणाला लावली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा दिग्गजांनी येथे जोरदार प्रचार मोहीम राबवूनही शेवटी कॉंग्रेसचीच सरशी झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेल्या शुक्लकाष्ठामुळे भाजपाचे हौसले बुलंद झाले होते. ही निवडणूक चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच असल्याने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कॉंग्रेसने माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना तर भाजपाने पालिकेतीलच सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाइन सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना जाधव यांच्या विजयासाठी आवाहन केले होते. काल मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच जाधव या आघाडीवर होत्या. अठरा हजार मतांची आघाडी शेवटपर्यंत राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीमुळे कॉंग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

17 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

36 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

43 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

52 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago