नाशिक

मुक्तचे विशाखा काव्य पुरस्कार जाहीर

 

 

अक्षय शिंपी, देवा झिंजाड, नामदेव कोळी यांचा सन्मान

 

नाशिक : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला देण्यात येणारा 2021 या वर्षासाठी विशाखा काव्य पुरस्कार अक्षय शिंपी, देवा झिंजाड आणि नामदेव कोळी यांना जाहीर झाला आहे. ही  माहिती कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी दिली. या पुरस्कारासाठी निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या कवितासंग्रहांची प्राथमिक निवड समितीद्वारे छाननी करण्यात आली. प्राथमिक समितीने निवडलेल्या निवडक काव्यसंग्रहांचे  परीक्षण अंतिम निवड समितीने केले.

या समितीमध्ये डॉ. अभिजित देशपांडे, डॉ. श्यामल बनसोड, नितीन भरत वाघ, रामचंद्र कांळुखे, प्रवीण दामले, श्रीमती विशाखा डावखर यांचा समावेश होता. अक्षय शिंपी यांच्या बिनचेहर्‍याचे भिन्न तुकडे या संग्रहाला प्रथम क्रमांक, देवा झिंजाड यांच्या सगळ उलथवून टाकलं पाहिजेफ या काव्य संग्रहाला व्दितीय, तर नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या संग्रहाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या कवींचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, कुलसचिव भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago