सर्व समुदायांसाठी मुंबईत वसतिगृह उभारणार : उपमुख्यमंत्री

 

नाशिक :प्रतिनिधी
वांद्रा ( मुंबई ) येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर आज जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वांत मोठे वसतिगृह उभारणार असून , या वसतिगृहात सारथी , महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती धर्माच्या समुदायातील मुला – मुलींना प्रवेश दिला जाईल , अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन ” भुजबळ , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , आमदार नरेंद्र दराडे , मोहम्मद इस्माईल , माजी आमदार अनिल कदम , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी गंगाथरन डी . उच्चशिक्षण संचालक डॉ . धनराज माने , महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे , सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी . डी . देशमुख आदी उपस्थित होते .

आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे . उच्च शिक्षणाची कास घरून आपले भवितव्य , पालकांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे . आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेऊन एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी , असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले .

एकोप्याची भावना दृढ होणार : पालकमंत्री

मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात महाज्योती , सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थिनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे व एकत्रित शिक्षणाने सर्वामध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे . लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे .

 

वसतिगृहनिर्मिती चळवळ राबविणार : सामंत

आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी , औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी दोन वसतिगृहे सुरू करणार आहेत व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत . मातोश्री मुलींच्या वसतिगृहात २०० विद्यार्थी क्षमता असून , यात ७५ विद्यार्थी सारथी संस्थेकडून ७५ विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व ५० विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत . या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज , एचपीटी कॉलेज , के.टी.एच.एम. कॉलेज , स्काऊट , एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *