नाशिक

सर्व समुदायांसाठी मुंबईत वसतिगृह उभारणार : उपमुख्यमंत्री

 

नाशिक :प्रतिनिधी
वांद्रा ( मुंबई ) येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर आज जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वांत मोठे वसतिगृह उभारणार असून , या वसतिगृहात सारथी , महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती धर्माच्या समुदायातील मुला – मुलींना प्रवेश दिला जाईल , अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन ” भुजबळ , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , आमदार नरेंद्र दराडे , मोहम्मद इस्माईल , माजी आमदार अनिल कदम , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी गंगाथरन डी . उच्चशिक्षण संचालक डॉ . धनराज माने , महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे , सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी . डी . देशमुख आदी उपस्थित होते .

आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे . उच्च शिक्षणाची कास घरून आपले भवितव्य , पालकांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे . आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेऊन एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी , असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले .

एकोप्याची भावना दृढ होणार : पालकमंत्री

मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात महाज्योती , सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थिनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे व एकत्रित शिक्षणाने सर्वामध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे . लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे .

 

वसतिगृहनिर्मिती चळवळ राबविणार : सामंत

आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी , औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी दोन वसतिगृहे सुरू करणार आहेत व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत . मातोश्री मुलींच्या वसतिगृहात २०० विद्यार्थी क्षमता असून , यात ७५ विद्यार्थी सारथी संस्थेकडून ७५ विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व ५० विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत . या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज , एचपीटी कॉलेज , के.टी.एच.एम. कॉलेज , स्काऊट , एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago