नाशिक

सर्व समुदायांसाठी मुंबईत वसतिगृह उभारणार : उपमुख्यमंत्री

 

नाशिक :प्रतिनिधी
वांद्रा ( मुंबई ) येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर आज जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वांत मोठे वसतिगृह उभारणार असून , या वसतिगृहात सारथी , महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती धर्माच्या समुदायातील मुला – मुलींना प्रवेश दिला जाईल , अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन ” भुजबळ , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , आमदार नरेंद्र दराडे , मोहम्मद इस्माईल , माजी आमदार अनिल कदम , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी गंगाथरन डी . उच्चशिक्षण संचालक डॉ . धनराज माने , महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे , सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी . डी . देशमुख आदी उपस्थित होते .

आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे . उच्च शिक्षणाची कास घरून आपले भवितव्य , पालकांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे . आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेऊन एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी , असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले .

एकोप्याची भावना दृढ होणार : पालकमंत्री

मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात महाज्योती , सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थिनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे व एकत्रित शिक्षणाने सर्वामध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे . लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे .

 

वसतिगृहनिर्मिती चळवळ राबविणार : सामंत

आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी , औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी दोन वसतिगृहे सुरू करणार आहेत व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत . मातोश्री मुलींच्या वसतिगृहात २०० विद्यार्थी क्षमता असून , यात ७५ विद्यार्थी सारथी संस्थेकडून ७५ विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व ५० विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत . या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज , एचपीटी कॉलेज , के.टी.एच.एम. कॉलेज , स्काऊट , एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Ashvini Pande

Recent Posts

घर क्रमांक प्लेटसाठी गटविकास अधिकार्‍याच्या पत्राने आश्चर्य

एजन्सीमार्फत वसुली; पत्र परत घ्या, अन्यथा आंदोलन : चारोस्कर दिंडोरी : प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील घरांना…

12 minutes ago

40 वर्षांनंतर रस्त्याचा तिढा अखेर सुटला

श्रमदानातून नगरसूलच्या महाले वस्तीवर रस्ता तयार नगरसूल : प्रतिनिधी येथील महाले वस्तीवरील गेल्या चाळीस वर्षांपासून…

17 minutes ago

सिन्नरला पर्यावरणदिनी भाजपा उद्योग आघाडीची जनजागृती रॅली

कापडी पिशवी वाटपासह प्लास्टिक बंदीचे आवाहन सिन्नर ः प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा…

23 minutes ago

सरस्वती गटारगंगा तर शिवनदीला पाणवेलींचा विळखा

सिन्नरकरांची अनास्था अन् प्रशासनाचे दुर्लक्ष सिन्नर ः प्रतिनिधी तीन-तीन नद्यांचा सहवास लाभलेल्या सिन्नरकरांची अनास्था अन्…

30 minutes ago

आडगाव परिसरात घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने व रोकड लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक गंभीर घटना समोर आली असून,…

41 minutes ago

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन

283 गुन्हेगारांची तपासणी; दोन व्यक्ती घातक शस्त्रांसह ताब्यात सिडको : विशेष प्रतिनिधी बकरी ईद सणाच्या…

54 minutes ago