नाशिक

इगतपुरीत हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू

इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे तलाव येथे अंघोळीसाठी गेलेल्या विशाल चंद्रकांत ठवळे, वय 36 वर्ष, राहणार डागबगंला, इगतपुरी या विवाहित तरुणावर रविवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने यात विशाल ठवळे याचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. यातील संशयित अज्ञात आरोपी फरार झाले असुन इगतपुरी पोलीस संशयित आरोपींचा कसून शोध घेत आहे.

रविवारी मयत विशाल ठवळे हा आपल्या 13 वर्षाचा भाचा व 8 वर्षाचा मुलगा सोबत घेवुन घरापासुन जवळच असलेल्या रेल्वे तलावात अंघोळीसाठी गेला होता.तलावाच्या पाण्यात अगोदरच दोन अज्ञात तरूणी व दोन तरूण हे अंघोळ करीत होते.याच ठिकाणी बाजुला विशाल ठवळे अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी आला तेव्हा बाजुच्या कपड्यावर पाणी उडाल्याची कुरापत काढुन संबंधित तरूणी व तरूणांनी वाद निर्माण करीत धारदार शस्त्राचा धाक दाखवुन विशाल यास मुलींची माफी मागण्यास सांगुन पाया पडण्यास व नाक घासण्यास लावले.
त्यानंतर वाद मिटला असे भासवुन झाल्यावर अज्ञात तरूणी व तरूण मद्य पिण्यासाठी तलावाच्या बाजुला बसले.यावेळी त्यातील एका अज्ञात तरूणाने मागुन पळत जात कुठल्यातरी धारदार शस्त्राने विशालच्या मानेची नस कापुन पुन्हा वार करणार तोच विशालने जोराची कींकाळी मारल्याने अज्ञात पसार झाले. मदतीसाठी धावा करणार्‍या विशालचाअति रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यु झाला अशी माहिती पोलीसांना विशालचा भाचा व मुलाने जबाबात दिली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल यास ग्रामिण रूग्णालयात आणले.पोलीसांनी घटनेचा पंचनामा करीत श्वानपथक व गुप्त माहितीद्वारे तपास यंत्रणा सुरू असुन फरार गुन्हेगाराला शोधण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान ऊभे ठाकले आहे.या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण
पसरले आहे.
विशेष म्हणजे मुंबई व नाशिक येथून चालत्या रेल्वेमध्ये अनधिकृत व्यवसाय करणारे हॉकर रोजच इगतपरी रेल्वे स्थानकात उतरुन शहरात दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे सर्रास पाहावयास मिळते.या हॉकर बरोबरच मेल एक्सप्रेसमध्ये तृतियपंथी व गाणे म्हणणार्‍या काही महिला व मुली शहरात धुडगुस घालत आहेत.या अनधिकृत हॉकरवर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचा अंकुश नसल्याने हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु आहे.त्याच प्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावलेले असुन याबाबत प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

7 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

7 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

7 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

8 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

8 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

8 hours ago