नाशिक

पैशांच्या वादातून मुकादमचा खून

 

दोन मजुरांना अटक

सटाणा: प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील नामपुर येथे पैशांच्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली असून जायखेडा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

नामपुर कृषि उत्पन्न बाजारसमितीतील कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या कांद्याच्या खळ्यावर कामाला असलेल्या तीन मजुरांमध्ये पैशांवरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होवून बिकासकुमार आणि अनिल कुमार या दोन तरुणांनी मुकादम शिवानंद कामत (वय 41) याचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुकादम शिवानंद कामत आणि आरोपींमध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याघेण्यावरून वाद झाला. आणि या वादातच दोघांनी मुकादम शिवानंद याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

7 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

8 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

8 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

8 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

8 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

8 hours ago