सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने चेहरामोहरा बदलवणार
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी कुंभ पर्वातील अमृत वचननामा जाहीर केला असून, या वचननाम्याच्या माध्यमातून नाशिक शहराला शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे, असे प्रतिपादन भाजपा नाशिक महानगर-जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केले. वसंतस्मृती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आगामी मनपा निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, महानगर सरचिटणीस सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, काशीनाथ शिलेदार, पीयूष अमृतकर, राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.
केदार म्हणाले की, अमृत वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, दूरदृष्टीने आखलेल्या पायाभूत विकासकामांचा ठोस आराखडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नाशिक शहराला मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, महिला सक्षमीकरणाच्या योजना, आरोग्य, शिक्षण, हरित व स्वच्छ नाशिकसाठी भाजप कटिबद्ध आहे.
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून 350 कोटींहून अधिक रुपयांची मराठा वसतिगृह, सावित्रीबाई रुग्णालय, सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा, क्रीडासंकुल, जलतरण तलाव, उद्याने व अन्य विकासकामे झाली आहेत. नाशिक पश्चिममध्ये आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात 300 कोटींहून अधिक रुपयांची पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, पोलीस स्टेशन व ईएसआय रुग्णालयाची कामे पूर्णत्वास येत आहेत. नाशिक पूर्वमध्ये आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघातही 300 कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे झाली असून, अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेसाठी बाह्य रिंगरोड, द्वारका सर्कल अंडरपास, रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे प्रकल्प मंजूर व प्रस्तावित असून, यामुळे नाशिक महानगर जगाच्या नकाशावर विकसनशील शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला.
गाजराचा हलवा करून खाल्ला
नाशिकरोड येथे काही नाराज कार्यकर्त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंतांवर अन्याय झाला. उमेदवारीचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात उमेदवारी दुसर्यांनाच दिल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी गाजर भेट दिले होते. काल माध्यमांनी यासंदर्भात शहराध्यक्ष सुनील केदार यांना त्या गाजराचे काय केले, असे विचारले असता केदार यांनीही मिश्किलपणे हलवा करून खाल्ला आणि प्रचाराला लागलो, असे उत्तर दिल्याने एकच हशा पिकला. स्वतः केदारही हसले. याबद्दलची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यावर नेटकर्यांनीही कधी विरोधी तर कधी मिश्किल दाद दिली.
कुंभमेळा भाजपचा मुख्य अजेंडा
साधू-संतांसाठी प्राथमिक सुविधा प्राधान्याने सुनिश्चित करणार. भाजपच्या कुंभ पर्वातील अमृत वचनात देशभरातून येणार्या साधू-संत-महंतांसाठी आरक्षित जागा, प्राथमिक गरजा आणि सोयीसुविधा पुरविणे हे प्रमुख संकल्प आहे.
– सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर
Nashik BJP’s Amrit Vachnama announced
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…