नाशिक कृउबा निवडणूक : ठाकरे गट स्वबळावर लढवणार



इच्छुक उमेदवारांची जाणून घेतली मते


नाशिक : प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार कार्यालयात पार पडली.
ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनिल बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींनी यावेळी इच्छुकांची मते जाणून घेतली.

माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे,माजी म.न.पा.गटनेते विलास शिंदे, उप जिल्हाप्रमुख महेश बडवे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,माजी नगरसेवक डी.जी. सुर्यवंशी,गोकूळ पिगंळे यांच्यासह इच्छुक उमेदवार भारती ताजनपुरे,सविता तुगांर,जगन आगळे,प्रकाश म्हस्के,भास्कर गावित, उत्तम खांडबाहाले,उत्तम आहेर,नवनाथ गायधनी, गोकूळ काकड,संजय तुगांर,सुरेश निमसे,दिनकर पाळदे,भरत आहेर,आशोक ( बालम ) बोराडे यांसह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक स्वबळावर लढवून ती जिंकण्याची आमची सक्षम यंत्रणा तयार आहे. निवडणूक स्वातंत्रपणे लढवाव्यात अशी इच्छुक उमेदवारांचे म्हणने असून त्यांचा आम्ही आदर बाळगतो.काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य मित्र पक्षही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांच्याशी युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील आणि माघारीच्या अंतिम तारखेच्या आधी याबातचा फैसला निश्चितच होईल,असे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख प्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. आम्ही सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याचे उपनेते सुनील बागूल म्हणाले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी आमदार वसंत गिते यांनीही मनोगत व्यक्त केले.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

17 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

17 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

17 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

17 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

17 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

17 hours ago