माणूस जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो आणि जातानाही एकटाच जातो, हे वैश्विक सत्य आहे. मात्र, समाजरचनेत स्त्रीचे जीवन अनेक नात्यांशी जोडले गेलेले असल्याने तिच्या आयुष्यातील वास्तव अनेकदा वेगळे असते. विशेषतः पतीचे निधन झाल्यानंतर अनेक महिलांना केवळ वैयक्तिक दुःखच नव्हे, तर समाजातील काही अनिष्ट प्रथा, रूढी आणि मानसिकतेलाही सामोरे जावे लागते. आज परिस्थिती हळूहळू बदलत आहे. पतीच्या निधनानंतरही अनेक महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत व्यवसाय सुरू केला. मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि समाजासमोर धैर्याचे उदाहरण ठेवले. अशा महिलांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक मार्फत मनवचेतनाफ अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश एकल महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा आहे. उमेद अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात 57 हजार 435 पात्र एकल महिलांची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी 32 हजार महिलांना कर्जसहाय्य देऊन विविध व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यात आली आहे, तर एक हजार 369 महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मार्चअखेर सर्व पात्र महिलांना उमेद अभियानाशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमामागे एक महत्त्वाचा संदेश आहे…समाजाने एकल महिलांकडे दयेने नव्हे, तर सन्मानाने पाहिले पाहिजे. एखाद्या महिलेवर वैधव्याचे दुर्दैव आले तर तिच्या आयुष्याचे रंग काढून घेण्याचा अधिकार समाजाला नाही. उलट तिच्या पाठीशी उभे राहून तिला जगण्याची नवी उमेद देणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.स्त्रियांनाही महिलादिनी एक आवाहन आहे, छोट्या- छोट्या गोष्टीवरून त्या घटस्फोेट घेतात. ज्या कारणाने घटस्फोट घेतला तीच कामे माहेरीही करतात. राधा, लक्ष्मी प्रत्येकीला व्हायचे आहे, पण श्रीरामाबरोबर वनवास काढणारी सीता कोणालाच व्हायचे नाही. सीतापण व्हायला पाहिजे. नशिबाला आले तसे साथ द्यायला हवी. शेवटी संसार दोघांचा असतो.
– प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
‘Navchetna’ gives new direction to single women
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…