वारकर्यांनी दिले इतके सोने
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, मंदिराला सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. मंदिराच्या कळसासाठी वारकर्यांनीही आपल्यापरीने योगदान दिले असून, सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार आहे. त्यासाठी सोने जमविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एक हजार वर्षे टिकू शकेल अशा काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला पूर्वी पितळी कळस बसविण्यात येणार होता. परंतु संस्थानचे माजी अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे यांनी कलस सोन्याचा असावा असा आग्रह सहधर्मदाय आयुक्तांकडे धरला. केवळ आग्रहच धरला नाही तर त्यांनी तातडीने 32 ग्रँम सोनेही दान करत या योगदानाला प्रारंभ केला. शिवाय गावोगावी झालेल्या कीर्तन, प्रवचनात केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला. महंत राजाभाऊ होळकर यांनी 10 ग्रँम,संपत महाराज धोंगडे 11 ग्रँम, महंत योगानंद माऊली 10 ग्रँम,ज्ञानेश्वर माऊली कदम 5 ग्रँम, उंबरखेड ग्रामस्थ 17 ग्रँम, संपत धात्रक 10 ग्रँम, शिवाजी जेऊघाले 10 ग्रँम याप्रमाणे सोने जमा झाले आहे. साधारणत: सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार असल्याचे सुवर्णकारांनी सांगितले.
निफाड : प्रतिनिधी मुख्य बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जाणारा रस्ता धामोरी -कोपरगाव या…
दोन वाहनांसह 12 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत सिन्नर ः प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्यावर…
धुळे : धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात असलेल्या…
भालजवळ कारवाई, दोघे अटकेत, गुन्हा दाखल शहापूर ः प्रतिनिधी उल्हासनगरजवळच्या भाल येथील सीताराम म्हात्रेनगर या…
शिर्डी : दर्शन घेऊन घरी परत जाताना काळाने घाला घातला. कारला अचानक आग लागल्यामुळे एका…
नाशिक : प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील द्वारका…