वारकर्यांनी दिले इतके सोने
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, मंदिराला सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. मंदिराच्या कळसासाठी वारकर्यांनीही आपल्यापरीने योगदान दिले असून, सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार आहे. त्यासाठी सोने जमविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एक हजार वर्षे टिकू शकेल अशा काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला पूर्वी पितळी कळस बसविण्यात येणार होता. परंतु संस्थानचे माजी अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे यांनी कलस सोन्याचा असावा असा आग्रह सहधर्मदाय आयुक्तांकडे धरला. केवळ आग्रहच धरला नाही तर त्यांनी तातडीने 32 ग्रँम सोनेही दान करत या योगदानाला प्रारंभ केला. शिवाय गावोगावी झालेल्या कीर्तन, प्रवचनात केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला. महंत राजाभाऊ होळकर यांनी 10 ग्रँम,संपत महाराज धोंगडे 11 ग्रँम, महंत योगानंद माऊली 10 ग्रँम,ज्ञानेश्वर माऊली कदम 5 ग्रँम, उंबरखेड ग्रामस्थ 17 ग्रँम, संपत धात्रक 10 ग्रँम, शिवाजी जेऊघाले 10 ग्रँम याप्रमाणे सोने जमा झाले आहे. साधारणत: सव्वाशे तोळे सोने या कळसासाठी लागणार असल्याचे सुवर्णकारांनी सांगितले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…