माजी खासदार शेट्टी ः योग्य वेळी पाऊल उचलणे आवश्यक होते
लासलगाव ः वार्ताहर
सध्या कांद्याला जो भाव मिळतोय तो कांदा उत्पादक शेतकर्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढासुद्धा मिळत नाही. कांदा निर्यातशुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजारभाव पडले ही सरकारची जबाबदारी आहे.अर्थात सरकारला योग्य वेळी पाऊले उचलणे आवश्यक होते, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लासलगाव येथे केली.
कांदा उत्पादक शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे नाशिक जिल्हा दौर्यावर आले असताना सोमवारी (दि. 21) त्यांनी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांसोबत लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी बांधवाशी संवाद साधला. घसरत्या कांद्याच्या भावासंदर्भात चर्चा केली. यावेळी लासलगाव बाजार समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, संचालक छबूराव जाधव, प्रवीण कदम, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी मनोज जैन यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृती गारे, संदीप जगताप, कृष्णा घुमरे, अनिता कोल्हे, आत्माराम पगार, गजानन घोटेकर, मच्छिंद्र जाधव, विलास दरगुडे, बाबासाहेब पगार व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यातशुल्क आधीच हटवले असते तर निश्चितच कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपयांच्या पुढे गेले असते. दोन-तीन महिन्यांपूर्वीच अंदाज आला होता की, यावर्षी मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन वाढले. गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणे हे सरकारचं काम आहे. नाशवंत शेतमालासाठी हमीभाव कायदा मी सरकारच्या मानगुटीवर बसून मंजूर करून घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नाफेडमार्फत होणार्या
खरेदीवर आमचा भरवसा नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाफेडने योग्य अशा सहकारी संस्थांमार्फत प्रत्यक्ष बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करावा, जेणेकरून स्पर्धा निर्माण होऊन कांद्याचे बाजारभाव वाढतील व कांदा उत्पादक शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.
तसेच लवकरच आम्ही दिल्लीच्या नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात भेट देऊन लिलाव प्रक्रिये संदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
इगतपुरीत शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन इगतपुरी ः प्रतिनिधी तालुक्यातील शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या…
सोग्रस : चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूलच्या शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बछड्यांसह बिबट्याचा…
सिन्नर : तालुक्यातील मोह येथे 60 फूट खोल विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी…
सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण नाशिक : प्रतिनिधी पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून…
तहसीलदारांच्या उपस्थितीत आज रौप्य आणि कांस्य पदकाने होणार सन्मान सिन्नर : प्रतिनिधी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण…
राज्यातील 34 हजार तर जिल्ह्यातील 1500 कर्मचारी वेतनाविना सिन्नर : प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून…